बुलढाणा ( प्रतिनिधी अनिल वायाळ) :
लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथील अतिशय मेहनती शेतकरी श्री सत्यनारायण परमेश्वर तेजनकर यांची कृषी विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तीन वर्षांपूर्वी एक हेक्टर फळबाग लागवड अंतर्गत आंबा लागवड केलेली होती.
सायंकाळी ठीक सहा वाजे दरम्यान सदर शेताच्या शेजारी असलेल्या सदाशिव चौगुले यांच्या शेतातील गव्हाच्या काडाला आग लागल्याने अचानक सुटलेल्या वाऱ्यावावधनाने सदर आग हि आंबा लागवड अंतर्गत असलेल्या गव्हाचे काडाकडे आली.व संपूर्ण आंब्याच्या बागेने काही क्षणात फार भयानक पेट घेतला.सदर परिस्थिती गावातील बऱ्याच गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सत्यनारायण तेजनकर यांच्या शेताकडे धाव घेऊन आग विझवण्याचा अतोनात प्रयत्न केला.परंतु ही आग एवढी भयानक होती की आग विझवणे शक्य न झाल्यामुळे गावकऱ्यांचे प्रयत्न फेल होऊन काही मिनिटातच सदर आंब्याच्या मळ्याचे होतेचे नव्हते झाले.
त्यामध्ये त्या झाडांसाठी फिनोलेक्स कंपनीची विस एम एम ड्रिप सुद्धा त्या आगीत जळून खाक झाले व स्पिंकलर संच सुद्धा जळून खाक झाल्यामुळे या शेतकऱ्यावर फार मोठा आघात झाला आहे.अतिशय रात्रंदिवस च्या मेहनती मधून हि बाग डोलताना दिसत होती व अवघ्या काही दिवसांवर या बागेचे आंब्याचे फळ सुद्धा खायच्या अवस्थेत असताना सदर आंब्याच्या बागेचे होतेचे नव्हते झाल्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
अतिवृष्टीनंतर पुन्हा आगि मुळे नुकसान
या आधि अतिवृष्टी व ढगफुटी मुळे शेतकरी सतीश तेजनकर यांच्या आंबेचे बागेचे नुकसान झाले होते.परंतु त्यांनी परत जिद्दीने झालेले नुकसान भरून काढले होते.वारंवार होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे.त्यामुळे सदर शेतकरी सतीश तेजनकर यांच्यावर कर्जाचा भार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब पंचनामा करून शेतकरी सतीश तेजनकर यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी जोर धरत आहे.तसेच अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शेतकऱ्यांना जनजागृती करण्याची गरज व्यक्त होत आहे.निसर्गाच्या सततच्या कोपामुळे शेतकऱ्याचे जीवन अस्थिर होऊन शासनाने अशा पीडित शेतकऱ्याला तात्काळ मदत करणे गरजेचे आहे.






















