Homeमनोरंजनरामनवमी निमित्ताने धायरी परिसरात भव्य शोभायात्रेचे आयोजन ; भाविक व नागरिकांचा उदंड...

रामनवमी निमित्ताने धायरी परिसरात भव्य शोभायात्रेचे आयोजन ; भाविक व नागरिकांचा उदंड प्रतिसाद.

Times Of Maharashtra :  रामनवमीनिमित्त धायरी परिसरात भगवान श्रीरामांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेत स्थानिक नागरिक, युवक व महिला मोठ्या उत्साहाने पारंपारिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले. या शोभायात्रेमुळे धायरीत प्रचंड उत्साहाचे, भक्तिपूर्ण आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले.

सरकार प्रतिष्ठान, अखिल नरवीर तानाजी मालुसरे पथ श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने ही शोभायात्रा आयोजित करण्यात आली. लक्ष्मी मंगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली आशिष बेनकर, अक्षय उंदरे, गणेश साखरे, सचिन सोनवणे, संदीप स्वामी, गणेश पासलकर, गणेश खामकर, अजिंक्य जाधव यांनी ही यात्रा भव्य आणि देखण्या स्वरूपात पार पाडली.

भव्य रथावर फुलांची आरास आणि दिव्यांची रोषणाई, त्यात प्रभू श्रीरामांची धनुर्धारी प्रतिमा स्थापित करण्यात आली. या रथाच्या समोर सध्या समाजातील अत्यंत गंभीर स्वरूप धारण केलेल्या महिलांवरील अत्याचार आणि विशेषतः लव्ह जिहादच्या नावाखाली होणारी महिलांची फसवणूक याबाबत जनजागृती करणारे देखावे, आणि चित्र यांचा समावेश असलेला रथ मार्गक्रमण करत होता. म मल्हारी खंडेराय आणि बानू यांच्या विवाहाचा देखावा आणि पारंपारिक कर्नाटकी देखावाही एका रथावर साकारण्यात आला.

शंखवादन पथक, परशुराम वाद्य पथक, ढोल लेझीम पथक, बँड पथके, वारकरी भजनी मंडळ यांनीही शोभायात्रेत सहभागी होऊन त्यात रंग भरले. शोभायात्रा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्याच्या बाजूला गर्दी केली. गणेश नगरी ते धायरी फाटा या मार्गावर काढण्यात आलेल्या या शोभायात्रेमुळे परिसरातील वातावरण पावित्र्यमय बनले.

शोभा यात्रेचे हे दुसरे वर्ष असून अल्पावधीतच या उपक्रमाला धायरीकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांमध्ये धर्मभावना, संघटितपणाची वृत्ती निर्माण करण्याबरोबरच विविध सामाजिक प्रश्नाबाबत वाचा फोडणे व जनजागृती करणे, या उद्देशाने मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या रथयात्रेचे आयोजन केले जात असल्याची माहिती गणेश साखरे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्तव्यावर असताना जवान सचिन राठोड यांचे आजाराने निधन; गंगाखेड तालुक्यात शोककळा

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : गंगाखेड तालुक्यातील भूमिपुत्र आणि भारतीय सैन्यात कर्तव्य बजावणारे जवान सचिन राठोड (वय 31) यांचे आजाराने निधन झाले. ही दुर्दैवी...

गेवराई पोलिसांची स्मार्ट कामगिरी! बंपरच्या तुकड्यावरून अपघातातील आरोपी जेरबंद

0
गेवराई प्रतिनिधी (विष्णू गायकवाड) : तपासातील सूक्ष्म निरीक्षण आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर गेवराई पोलिसांनी हिट-अँड-रन प्रकरणातील आरोपीचा शोध लावत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. केवळ...

३८ वर्षांनी पुन्हा भरली शाळा; गेवराईत माजी विद्यार्थ्यांचा भावनिक स्नेहमिलन सोहळा

0
गेवराई : प्रतिनिधी (विष्णु गायकवाड) : पुन्हा ती शाळा, पुन्हा ती घंटा, पुन्हा तो वर्ग, या आठवणींना उजाळा देत गेवराई येथील १९८८-८९ बॅचच्या माजी...

दौंडचा अभिमान! डॉ. बबन माने यांना वाणिज्य विषयात पीएच.डी.

0
दौंड  (प्रतिनिधी संघराज गायकवाड ) : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत दौंड येथील डॉ. बबन सुरेश माने यांनी आपल्या कर्तृत्वाने नवा मानाचा तुरा रोवला...

अवकाळी पावसाचा शिरपूर तालुक्याला मोठा फटका

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका तब्बल 30 गावांना...

कर्तव्यावर असताना जवान सचिन राठोड यांचे आजाराने निधन; गंगाखेड तालुक्यात शोककळा

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : गंगाखेड तालुक्यातील भूमिपुत्र आणि भारतीय सैन्यात कर्तव्य बजावणारे जवान सचिन राठोड (वय 31) यांचे आजाराने निधन झाले. ही दुर्दैवी...

गेवराई पोलिसांची स्मार्ट कामगिरी! बंपरच्या तुकड्यावरून अपघातातील आरोपी जेरबंद

0
गेवराई प्रतिनिधी (विष्णू गायकवाड) : तपासातील सूक्ष्म निरीक्षण आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर गेवराई पोलिसांनी हिट-अँड-रन प्रकरणातील आरोपीचा शोध लावत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. केवळ...

३८ वर्षांनी पुन्हा भरली शाळा; गेवराईत माजी विद्यार्थ्यांचा भावनिक स्नेहमिलन सोहळा

0
गेवराई : प्रतिनिधी (विष्णु गायकवाड) : पुन्हा ती शाळा, पुन्हा ती घंटा, पुन्हा तो वर्ग, या आठवणींना उजाळा देत गेवराई येथील १९८८-८९ बॅचच्या माजी...

दौंडचा अभिमान! डॉ. बबन माने यांना वाणिज्य विषयात पीएच.डी.

0
दौंड  (प्रतिनिधी संघराज गायकवाड ) : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत दौंड येथील डॉ. बबन सुरेश माने यांनी आपल्या कर्तृत्वाने नवा मानाचा तुरा रोवला...

अवकाळी पावसाचा शिरपूर तालुक्याला मोठा फटका

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका तब्बल 30 गावांना...
error: Content is protected !!