Homeताज्या बातम्याइतक्या वर्षात शरद पवारांनी मराठा समाजासाठी केल तरी काय ? भाजप महिला...

इतक्या वर्षात शरद पवारांनी मराठा समाजासाठी केल तरी काय ? भाजप महिला आमदाराचा सुप्रिया सुळेंना सवाल…

 

इतक्या वर्षात शरद पवारांनी मराठा समाजासाठी केल तरी काय ? भाजप महिला आमदाराचा सुप्रिया सुळेंना सवाल…

मुंबई : मराठा आरक्षणावरून राज्यभरात हिंसक आंदोलन पेटलं आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

त्यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. सुप्रिया सुळेंच्या सरकारवरील टीकेला उत्तर देताना ४० वर्षात तुमच्या वडिलांनी मराठा आरक्षणासाठी काय केले असा सवाल करत आमदार मेघना बोर्डीकर यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, ४० दिवसांमध्ये मराठा आरक्षणासाठी सरकारने काय केले असा प्रश्न सुप्रिया सुळे विचारतात पण १९८० माझा मराठा समाज आरक्षण मागतोय. तेव्हापासून आपले वडील शरद पवार यांना मराठा समाजाने डोक्यावर घेतले. सत्ता आपल्या वडिलांकडे आणि घराण्याकडे दिली. आज ४० वर्षात आपण समाजासाठी काय केले हे मी मराठा समाजाची मुलगी म्हणून तुम्हाला विचारते. ४० वर्षात तुम्ही मराठा समाजासाठी चांगले केले असते तर माझ्या तरुण बांधवांना आज रस्त्यावर उतरायची वेळ आली नसती असं त्यांनी म्हटलं.

तसेच मनोज जरांगे पाटीलांचे उपकार माना, आज त्यांनी मराठा समाज एकत्र आणला आहे. देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले आणि तेच आरक्षण हायकोर्टात टिकवून दाखवले. त्यानंतर तुमचे वडील शरद पवार यांच्या कृपेने महाराष्ट्रावर लादलेले सरकार आले. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आपल्याला मिळालेले मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात गेले तेव्हा आपण मूग गिळून गप्प का होता या प्रश्नाचे उत्तर राज्यातील जनतेला अपेक्षित आहे असा टोलाही आमदार मेघना बोर्डीकर यांनी सुप्रिया सुळेंना लगावला.

दरम्यान, आज तुम्ही आरक्षणासाठी कळवळ व्यक्त करतायेत, परंतु राज्यातील संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलंय मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आम्हा सर्वांना मराठा समाजाला आरक्षण मिळेल असा विश्वास आहे. आम्ही देखील सत्ताधारी आमदार असलो तरी आरक्षणासाठी सरकारला जाब विचारू, मराठा समाजाला हक्काचे आरक्षण दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. पण तुम्ही समाजातील तरुण मुलांच्या भावना भडकवण्याचे काम करू नये अशी विनंतीही आमदार मेघना बोर्डीकर यांनी सुप्रिया सुळेंना केली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...
error: Content is protected !!