Homeक्राईमचार दिवस उलटले आरोपी अजूनही फरार गोरेगाव लोणेरेत संतापाचा स्फोट न्यायासाठी जनआक्रोश...

चार दिवस उलटले आरोपी अजूनही फरार गोरेगाव लोणेरेत संतापाचा स्फोट न्यायासाठी जनआक्रोश उसळला

माणगाव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी लॉजमध्ये २२ वर्षीय पल्लवी प्रवीण मोरे (रा. वडगाव बौद्धवाडी) या तरुणीवर अत्यंत क्रूर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अमानुष घटनेला चार दिवस उलटूनही आरोपी अद्याप फरार असल्याने गोरेगाव–लोणेरे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

१९ एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका निष्पाप मुलीची अशा पाशवी पद्धतीने हत्या होणे आणि त्यानंतरही आरोपींची अटक न होणे, ही पोलिस यंत्रणेची गंभीर अपयश असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. “कायद्याचा धाक उरला आहे का?” असा थेट सवाल आता जनतेकडून उपस्थित केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय संघटना एकत्र आल्या असून त्यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. नरेश अहिरे, विकास गायकवाड, प्रमोद घोसाळकर, अरुण चाळके, नंदकुमार शिर्के, बापू सोनगीरे, मुख्तार वेळासकर, दिनेश हरवंडकर, स्वाती करकरे, स्वीटी गिरासे, नाना महाले, प्रदीप गोरेगावकर, मधुकर नाडकर, अशोक यादव, रोहन साळवी आदींनी एकमुखाने इशारा दिला आहे की, “आरोपींना तत्काळ अटक झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. न्याय मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही.”

दरम्यान, पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई दिसून आलेली नाही. घटनास्थळावरील पुरावे, फॉरेन्सिक तपास, मोबाईल लोकेशन तपासणी सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी “परिणाम कुठे आहेत?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. “लवकरच आरोपी पकडले जातील,” या नेहमीच्या आश्वासनांवर आता लोकांचा विश्वास उरलेला नाही.

परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली असून गोरेगाव व लोणेरे हे संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, नागरिकांच्या मनातील संताप तीव्र असल्याने परिस्थिती कधीही चिघळण्याची भीती व्यक्त होत आहे.

पीडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या “आमच्या मुलीला न्याय द्या” या आक्रोशाने संपूर्ण समाज हेलावून गेला आहे.

दरम्यान, २५ एप्रिल रोजी गोरेगाव–लोणेरे बंदची हाक देण्यात आली होती. सकाळी १० वाजता ‘जन-अक्रोश मोर्चा’ काढण्याचे नियोजन होते, मात्र पोलिसांच्या आश्वासनानंतर तो तात्पुरता पुढे ढकलण्यात आला. तरीही ३० एप्रिलपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास २ मे रोजी मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून संपूर्ण व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत आणि पीडितेला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हस्तनपूर परिसरात बिबट्याचा वावर वासरावर हल्ला ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

0
जिल्हा (प्रतिनिधी धनंजय कावडे शिखर शिंगणापूर): सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील हस्तनपूर येथे बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हस्तनपूरसह...

शारदा हॉस्पिटलच्या आरोग्य शिबिरास तलवाडा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई येथील शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने तलवाडा येथील माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य...

नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात १७ वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

0
 निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : निफाड तालुक्यातील पिंपळस परिसरात २३ तारखेला दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन...

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

हस्तनपूर परिसरात बिबट्याचा वावर वासरावर हल्ला ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

0
जिल्हा (प्रतिनिधी धनंजय कावडे शिखर शिंगणापूर): सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील हस्तनपूर येथे बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हस्तनपूरसह...

शारदा हॉस्पिटलच्या आरोग्य शिबिरास तलवाडा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई येथील शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने तलवाडा येथील माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य...

नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात १७ वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

0
 निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : निफाड तालुक्यातील पिंपळस परिसरात २३ तारखेला दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन...

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...
error: Content is protected !!