Homeताज्या बातम्यामुंबई लोकल अपघात : प्रचंड गर्दीचा बळी, चौघांचा दुर्दैवी मृत्यू – केंद्रीय...

मुंबई लोकल अपघात : प्रचंड गर्दीचा बळी, चौघांचा दुर्दैवी मृत्यू – केंद्रीय मंत्र्यांकडून मौन

 

 मुंब्रा-दिवा स्थानकादरम्यान सोमवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. लोकल ट्रेनच्या दरवाजात लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागून १३ प्रवासी ट्रॅकवर कोसळले. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला असून इतर प्रवासी गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये एका जीआरपी पोलिसाचा देखील समावेश आहे.

 

मुंबईसारख्या महानगराची लाइफलाइन समजली जाणारी लोकल ट्रेन गर्दीमुळे आज डेथलाइन ठरते आहे. दररोज लाखो प्रवासी याच लोकलवर अवलंबून असतात. मात्र लोकलच्या अपुऱ्या फेऱ्या, गाड्यांची मर्यादित संख्या आणि व्यवस्थेतील अकार्यक्षमता यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत. स्थानिक प्रवाशांकडून गाड्यांची संख्या वाढवण्याची सातत्याने मागणी होत असतानाही रेल्वे प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप होत आहे.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers
👆👆Click the Image below👆👆

 

या भीषण अपघातावर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. दिल्लीत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी असताना पत्रकारांनी त्यांना या दुर्घटनेबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की, “रेल्वे मंत्रालयाने यावर पत्रक काढलं आहे, त्यामुळे यावर जास्त बोलण्याची गरज नाही.” विशेष म्हणजे, सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणारे वैष्णव यांनी या अपघाताबाबत कोणतीही पोस्ट, श्रद्धांजली किंवा शोकप्रकट केला नाही, यावरून त्यांच्या भूमिकेवर टीका होत आहे.

दरम्यान, राज्य सरकारने अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मुंबईकरांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून, “कधी रेल्वे प्रशासन जागं होणार?” असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गर्दीत लटकून प्रवास करणं ही मजबुरी असून, ती शोकांतिका ठरू नये यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज अधिकच तीव्र झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अहिल्यानगर जिल्ह्यातील ९ तांड्यांना ‘ग्रामपंचायत’ दर्जा; या लढ्याचे शिल्पकार विष्णुपंत पवार यांचा पाथर्डी...

0
Times Of  Maharashtra Desk : निष्ठा, सातत्य आणि प्रामाणिक लोकसेवा असेल तर अशक्यही शक्य होते, हे आपल्या ३० वर्षांच्या तपश्चर्येतून सिद्ध करणारे ज्येष्ठ सामाजिक...

पुण्यातील ‘पर्शियन दरबार’ हॉटेलच्या बिर्याणीत आढळले झुरळ; मॅनेजर विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल

0
Times of Maharashtra Desk, Pune: पुण्यातील प्रसिद्ध पर्शियन दरबार हॉटेलमध्ये जेवताना एका ग्राहकाला धक्कादायक अनुभव आला आहे. हॉटेलमध्ये मागवलेल्या चिकन बिर्याणीमध्ये झुरळ आढळल्याची घटना...

भोसरी MIDC जमीन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात बिगर-जामीनपात्र अटक वॉरंट

0
विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी ) : पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसी (MIDC) जमीन खरेदी प्रकरणात माजी महसूल मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या...

दौंड नगरपालिकेच्या हद्दीतील विरंगुळा केंद्रात अनधिकृत काम सुरू?

0
संघराज गायकवाड, राहुल आढाव ( दौंड प्रतिनिधी ) :  नगरपालिका हद्दीतील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू असल्याचे चित्र आहे....

पहूरमध्ये तरुणीची निर्घृण हत्या; प्रेमसंबंधातून वाद वाढून जिवंत जाळल्याचा आरोप

0
विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी) :  जिल्ह्यातील पहूर तालुक्यात पळासखेडा देवस्थान परिसरातील जंगलात एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली...

अहिल्यानगर जिल्ह्यातील ९ तांड्यांना ‘ग्रामपंचायत’ दर्जा; या लढ्याचे शिल्पकार विष्णुपंत पवार यांचा पाथर्डी...

0
Times Of  Maharashtra Desk : निष्ठा, सातत्य आणि प्रामाणिक लोकसेवा असेल तर अशक्यही शक्य होते, हे आपल्या ३० वर्षांच्या तपश्चर्येतून सिद्ध करणारे ज्येष्ठ सामाजिक...

पुण्यातील ‘पर्शियन दरबार’ हॉटेलच्या बिर्याणीत आढळले झुरळ; मॅनेजर विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल

0
Times of Maharashtra Desk, Pune: पुण्यातील प्रसिद्ध पर्शियन दरबार हॉटेलमध्ये जेवताना एका ग्राहकाला धक्कादायक अनुभव आला आहे. हॉटेलमध्ये मागवलेल्या चिकन बिर्याणीमध्ये झुरळ आढळल्याची घटना...

भोसरी MIDC जमीन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात बिगर-जामीनपात्र अटक वॉरंट

0
विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी ) : पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसी (MIDC) जमीन खरेदी प्रकरणात माजी महसूल मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या...

दौंड नगरपालिकेच्या हद्दीतील विरंगुळा केंद्रात अनधिकृत काम सुरू?

0
संघराज गायकवाड, राहुल आढाव ( दौंड प्रतिनिधी ) :  नगरपालिका हद्दीतील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू असल्याचे चित्र आहे....

पहूरमध्ये तरुणीची निर्घृण हत्या; प्रेमसंबंधातून वाद वाढून जिवंत जाळल्याचा आरोप

0
विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी) :  जिल्ह्यातील पहूर तालुक्यात पळासखेडा देवस्थान परिसरातील जंगलात एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली...
error: Content is protected !!