Homeताज्या बातम्याआंबेडकर भवन विस्तारीकरणासाठी सकारात्मक पावले; मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून तत्काळ निर्णयाचे आश्वासन

आंबेडकर भवन विस्तारीकरणासाठी सकारात्मक पावले; मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून तत्काळ निर्णयाचे आश्वासन

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयासमोरील जागेवर उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणासह राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याच्या मागणीला मुख्य मंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीबाबत शासन स्तरावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आंबेडकरी चळवळीच्या शिष्टमंडळाला दिले.

 

पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्षीय नेत्यांनी संयुक्तपणे उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत सदर मागणीचे निवेदन सादर केले. ससून हॉस्पिटल समोरील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक आणि आधुनिक सांस्कृतिक केंद्र उभारण्याबाबत मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून त्यांनी तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतरच अंतिम निर्णय होईल असे स्पष्ट केले होते.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below👆👆

या पार्श्वभूमीवर, पुन्हा एकदा शिष्टमंडळाने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान स्मारकासाठी लागणाऱ्या जागेची निश्चिती, निधी, नियोजन व प्रशासकीय प्रक्रियेबाबत सकारात्मक चर्चा झाली. राज्य शासन या महत्त्वाच्या सांस्कृतिक प्रकल्पाकडे गांभीर्याने पाहत असून बाबासाहेबांच्या स्मृतीस योग्य असा जागतिक दर्जाचा प्रकल्प उभारण्यात येईल, असेही आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी दिले.

यावेळी शिष्टमंडळामध्ये परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, शैलेंद्र चव्हाण, राहुल डंबाळे आणि संजय सोनवणे यांच्यासह इतर मान्यवर नेते उपस्थित होते.

हे शिष्टमंडळ सातत्याने शासनाकडे तसेच अनेक मंत्र्यांकडे पाठपुरावा करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!