Homeताज्या बातम्यानागपूर-सावनेर: २४ तासात तीन अपघात, दोन मृत्यू – महामार्गावर मृत्यूचे सत्र कायम

नागपूर-सावनेर: २४ तासात तीन अपघात, दोन मृत्यू – महामार्गावर मृत्यूचे सत्र कायम

नागपूर-सावनेर: – सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या २४ तासात वेगवेगळ्या तीन अपघातांच्या घटना घडल्या असून त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

पहिली घटना सावनेर-नागपूर रोडवरील मानेगाव शिवारात शुक्रवारी घडली. नागपूरवरून भरधाव येणाऱ्या एमएच ४९ बी आर ८७२९ क्रमांकाच्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार मन्साराम कुंभरे (वय ५०, रा. मानेगाव) गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ नागपूर येथील मेडिकल शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दुसरी घटना सावनेर-कळमेश्वर मार्गावर बोरगाव शिवारात घडली. रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी खांबाला अॅक्टिवा वाहनाची धडक बसली. या अपघातात अॅक्टिवा चालवणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below 👆👆

तिसऱ्या अपघातात मंगळवारी सायंकाळी ११ वाजताच्या सुमारास पांढुर्णा मार्गावर पेटी शिवारात कंटेनर (एमएच ४०/एके ४७५६) वळण घेत असताना फळांनी भरलेल्या पिकअप वाहनाने कंटेनरला जबर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की पिकअप वाहन उलटून त्याचा केबिनचा भाग अक्षरशः चुरडून गेला. या अपघातात पिकअपचा चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले. जखमींची नावे अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाहीत.

या तीनही घटनांमुळे वाहनचालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पोलिसांनी अपघातांबाबत चौकशी सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...
error: Content is protected !!