खराडी : महापालिकेच्या पथविभागाने खराडीतील थोपटे चौक
ते रिलायन्स चौकादरम्यान केबल टाकण्यासाठी मुख्य रस्ता व पदपथ खोदाईसाठी परवानगी दिली. त्यानंतर ठेकेदारांनी पदपथापासून पुढे पाच फूट मुख्य रस्ता खोदून केबल भूमिगत करण्याचे काम केले, मात्र गेल्या महिनाभरापासून या रस्त्यावर डांबरीकरण करून रस्ता पूर्ववत न केल्याने येथे लांबपर्यंत खड्डा पडला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. येथे मोठी दुर्घटना झाल्यास पथविभागास जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
खराडीत मुंढवा नदी पूल ते खराडी रिलायन्स मॉलदरम्यान केबल वायर टाकण्यास महापालिकेने सशुल्क परवानगी दिली होती. त्यानंतर ठेकेदाराने सुमारे दोन किलोमीटर लांब, पाच फूट रुंद व तीन फूट खोल असा डांबरी रस्ता खोदला, मात्र केबल भूमिगत टाकून झाल्यावर त्याने रस्त्यावर माती टाकून खड्डा बुजविण्याचा कामचुकारपणा केला. त्यामुळे रस्त्यावर काही ठिकाणी एक ते दीड फूट खड्डे पडले आहेत. येथील खड्ड्यांतून वाहने नेण्यास चालक धजत नाहीत. त्यामुळे येथे वाहतूक संथ होऊन कोंडी निर्माण होते. पाच फूट रुंदीचा खड्डा व त्याभोवती पसरलेला मुरूम व मातीमुळे दुचाकीस्वारांचे हाल होतात, मात्र पथविभागाला याचे काही देणे-घेणे नाही. त्यामुळे एखाद्या चालकावर मृत्यू ओढवल्यास त्याला जबाबदार ठेकेदार असणार की पथ विभागाचे अधिकारी, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
Advertisement by Unique Computers
👇👇Click the Image below👇👇
Advertisement by Unique Computers
👇👇Click the Image below👇👇
खराडी बायपास ते मुंढवा नदीपुलादरम्यान सुमारे तीन किलोमीटरच्या आतासुद्धा रस्त्यावर माती व मुरूम पसरला आहे. ठेकेदार गेल्या दोन महिन्यांपासून अर्धवट काम सोडून गायब झाला आहे.























