Homeताज्या बातम्याKharadi Road Issue : खोदलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे दुर्लक्ष; खड्यांमुळे वाहनचालकांचे अपघात

Kharadi Road Issue : खोदलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे दुर्लक्ष; खड्यांमुळे वाहनचालकांचे अपघात

खराडी: खराडीतील मुख्य रस्त्याच्या  खोदकामानंतर महिना उलटूनही डांबरीकरण न झाल्याने अपघात होत असून नागरिकांनी महापालिका पथविभागावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

 

खराडी : महापालिकेच्या पथविभागाने खराडीतील थोपटे चौक

ते रिलायन्स चौकादरम्यान केबल टाकण्यासाठी मुख्य रस्ता व पदपथ खोदाईसाठी परवानगी दिली. त्यानंतर ठेकेदारांनी पदपथापासून पुढे पाच फूट मुख्य रस्ता खोदून केबल भूमिगत करण्याचे काम केले, मात्र गेल्या महिनाभरापासून या रस्त्यावर डांबरीकरण करून रस्ता पूर्ववत न केल्याने येथे लांबपर्यंत खड्डा पडला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. येथे मोठी दुर्घटना झाल्यास पथविभागास जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

खराडीत मुंढवा नदी पूल ते खराडी रिलायन्स मॉलदरम्यान केबल वायर टाकण्यास महापालिकेने सशुल्क परवानगी दिली होती. त्यानंतर ठेकेदाराने सुमारे दोन किलोमीटर लांब, पाच फूट रुंद व तीन फूट खोल असा डांबरी रस्ता खोदला, मात्र केबल भूमिगत टाकून झाल्यावर त्याने रस्त्यावर माती टाकून खड्डा बुजविण्याचा कामचुकारपणा केला. त्यामुळे रस्त्यावर काही ठिकाणी एक ते दीड फूट खड्डे पडले आहेत. येथील खड्ड्यांतून वाहने नेण्यास चालक धजत नाहीत. त्यामुळे येथे वाहतूक संथ होऊन कोंडी निर्माण होते. पाच फूट रुंदीचा खड्डा व त्याभोवती पसरलेला मुरूम व मातीमुळे दुचाकीस्वारांचे हाल होतात, मात्र पथविभागाला याचे काही देणे-घेणे नाही. त्यामुळे एखाद्या चालकावर मृत्यू ओढवल्यास त्याला जबाबदार ठेकेदार असणार की पथ विभागाचे अधिकारी, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

पथविभागाच्या अधिपथविभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या कामावर लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांच्या गलथान कारभारामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदाराकडून रस्त्यावर डांबर टाकून घेऊन रस्ता लवकर पूर्ववत करून नागरिकांची या त्रासातून सुटका करावी.

खराडी बायपास ते मुंढवा नदीपुलादरम्यान सुमारे तीन किलोमीटरच्या आतासुद्धा रस्त्यावर माती व मुरूम पसरला आहे. ठेकेदार गेल्या दोन महिन्यांपासून अर्धवट काम सोडून गायब झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...
error: Content is protected !!