तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाने सिरोंचा तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली असून एक अभ्यासू,शांत,संयमी आणि उत्कृष्ट लेखन शैली असलेला पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.पत्रकारिता म्हणजे समाजातील सत्य जनतेसमोर मांडण्याचे माध्यम,आणि हे कार्य कबीर शेख यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व निस्वार्थ भावनेने आयुष्यभर केले.अनेक नवोदित पत्रकारांना त्यांनी पत्रकारितेचे धडे दिले,लेखनाची दिशा दिली आणि समाजातील प्रश्नांवर निर्भीडपणे लिहिण्याची प्रेरणा दिली.
गरीब,सर्वसामान्य आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना त्यांनी आपल्या लेखणीतून नेहमीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.त्यांची साधी राहणी,माणुसकीची जाणीव आणि समाजाशी असलेली बांधिलकी कायम स्मरणात राहील.त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व शोकाकुल परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो,हीच प्रार्थना.






















