Homeताज्या बातम्याबकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला मुलाणी समाजाचे अध्यक्ष शाहरुख मुलाणी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दि. 28 मे 2026 रोजी देशभरात बकरी ईद साजरी होणार असून राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील हजारो गरीब शेतकरी वर्षभर मेहनत करून शेळीपालन व बोकड पालन करतात. वर्षातून एकदाच हे शेतकरी मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये बोकड विक्रीसाठी आणतात. मात्र, पोलीस व आरटीओ प्रशासनाकडून अशा वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाया करून वाहने जप्त केली जात असल्याने शेतकरी वर्गामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरटीओ प्रशासनाकडून जनावरे वाहतुकीसाठी विशेष परवान्याची अट घालण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, केवळ आठवडाभराच्या वाहतुकीसाठी संपूर्ण वर्षाचा परवाना काढणे गरीब शेतकऱ्यांना शक्य नसल्याचे मुलाणी यांनी नमूद केले. शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून जप्त केलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनांवर नाममात्र ₹1000 दंड आकारून ती तात्काळ सोडावीत, तसेच ग्राहकांच्या वाहनांवर ₹300 दंड आकारून कारवाई थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी शाहरुख मुलाणी म्हणाले, “शासन एकीकडे शेळीपालनासाठी अनुदान देते, तर दुसरीकडे त्याच शेतकऱ्यांना कायद्याच्या नावाखाली त्रास दिला जात आहे. गरीब शेतकरी वर्षभर मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. बकरी ईद निमित्त मुंबई व इतर मेट्रो शहरांमध्ये विक्रीसाठी आणले जाणारे बोकड हे राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशमधील गोरगरीब शेतकऱ्यांचे असतात. या व्यापारातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांच्या मुलांचे शिक्षण, विवाह, शेतीचा खर्च आणि संसार अवलंबून असतो.”

पोलीस व आरटीओ प्रशासनाने मानवीय दृष्टीकोन ठेवून कारवाई करावी, अन्यथा समाजातील वाढत्या नाराजीला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बोकडांची तपासणी करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सदर निवेदनाची प्रत परिवहन आयुक्त, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग, विविध शेतकरी संघटना, हिंदू खाटीक समाज संघटना तसेच बोकड व्यापारी संघटनांना पाठविण्यात आली आहे.

प्रमुख मागण्या :बकरी ईद निमित्त बोकड वाहतूक करणाऱ्या शेतकरी व ग्राहकांच्या वाहनांवरील कारवाई तात्काळ थांबवावी.

जप्त करण्यात आलेली शेतकऱ्यांची वाहने प्रती वाहन ₹1000 दंड आकारून तात्काळ सोडावीत.
ग्राहकांच्या वाहनांवर केवळ ₹300 नाममात्र दंड आकारून ती वाहने मुक्त करावीत.
पोलीस व आरटीओ प्रशासनाला मानवीय दृष्टीकोन ठेवून कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश द्यावेत.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बोकडांची तपासणी करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

“शेतकऱ्यांनी व्यापार करायचा नाही तर कोणी करायचा?”; मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांना निवेदन

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

दहिवद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :तहसील कार्यालय शिरपूर दी 20/5/2026 महाराष्ट्र शासनाच्या महसुल व वनविभागाच्या दिनांक 18 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार क्षेत्रिय स्तरावर ग्रामिण...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

दहिवद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :तहसील कार्यालय शिरपूर दी 20/5/2026 महाराष्ट्र शासनाच्या महसुल व वनविभागाच्या दिनांक 18 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार क्षेत्रिय स्तरावर ग्रामिण...
error: Content is protected !!