अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात २४२ प्रवासी होते. विमान कोसळताच विमानाला आग लागली

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात २४२ प्रवासी होते. विमान कोसळताच विमानाला आग लागली
अहमदाबाद :अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला आज सकाळी एक भीषण अपघात झाला. विमानात एकूण २४२ प्रवासी होते. अपघातानंतर विमानाला तात्काळ आग लागली, ज्यामुळे बचावकार्य अधिक कठीण झाले.

 

अपघात नेमका कसा झाला याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, उड्डाणानंतर काही वेळातच विमानाच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वैमानिकांनी आपत्ती नियंत्रणासाठी प्रयत्न केले, मात्र विमान अचानक कोसळले.

अपघात घडताच तातडीने अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

 

एअर इंडियने या घटनेची अधिकृत दखल घेतली असून प्रवाशांच्या कुटुंबीयांसाठी हॉटलाइन क्रमांक जारी केला आहे.

मृत्युदर आणि जखमींची संख्या अद्याप स्पष्ट नाही. घटनास्थळी मदत कार्य सुरु असून सरकारी यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

ह्या भीषण अपघातामुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधानांनीही या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत, संपूर्ण चौकशीचे आदेश दिले आहेत.ताज्या माहितीसाठी आमच्या सोबत रहा.