Homeताज्या बातम्यापुणे कचरा संकट : कोथरूड कचरा डेपोची जागा मेट्रोलाच, कचरा व्यवस्थापनाचा गंभीर...

पुणे कचरा संकट : कोथरूड कचरा डेपोची जागा मेट्रोलाच, कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न उभा…

पुणे – कोथरूडमधील कचरा डेपोची सुमारे चार एकर जागा महापालिकेने महामेट्रोला दिल्यामुळे कोथरूड, वारजे आणि कर्वेनगर परिसरात कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे ओल्या आणि सुक्या कचऱ्याच्या प्रकल्पांचे काम ठप्प झाले असून, नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

 

महापालिका प्रशासन आधीच कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरत असल्याचे चित्र असताना, या जागेच्या हस्तांतरणामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. ‘स्वच्छ पुणे – सुंदर पुणे’चा नारा देत भिंती रंगविण्यात येत असल्या तरी प्रत्यक्षात शहराची स्थिती ‘अस्वच्छ पुणे – कुरूप पुणे’ अशी झाली आहे, अशी तीव्र टीका सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे. त्यांनी याबाबत आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे तक्रारही दाखल केली आहे.

दरम्यान, हडपसरमधील २०० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प गेल्या तीन आठवड्यांपासून बंद आहे. तसेच धायरीतील ५० टन सुक्या कचऱ्यावरील प्रकल्पात आग लागल्याने तोही गेल्या महिनाभरापासून बंद आहे. परिणामी, दररोज २५० टन कचऱ्याच्या विल्हेवाटीचा गंभीर पेच प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below👆👆

पवसामुळे ओल्या कचऱ्याचे प्रमाण वाढत असून, संकलन, हस्तांतरण आणि प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांवर अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोथरूड डेपो बंद झाल्याने, या भागातून येणाऱ्या १२५ कचरा गाड्यांना औंध, घोले रस्ता आणि कात्रज येथील केंद्रांवर पाठवावे लागत आहे. यामुळे वाहतुकीचा खर्च आणि वेळ दोन्ही वाढत असून, परिसरात कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत.

या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गोंधळानंतर प्रशासनाने तत्काळ हालचाल करत महामेट्रोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही जागा तात्पुरती परत मागितली. त्यानुसार चार महिन्यांसाठी ही जागा पुन्हा महापालिकेला वापरासाठी देण्यात आली आहे.

महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, हडपसरमधील प्रकल्प देखभाल दुरुस्तीसाठी बंद असून तो आठ दिवसांत पुन्हा सुरू होईल. तसेच कोथरूडमधील जागा २०१८ मध्येच महामेट्रोला देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत चार महिन्यांसाठी तेथील ‘रॅम्प’ पुन्हा सुरू ठेवण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...
error: Content is protected !!