देऊळगाव (प्रतिनिधी बबनराव नागरे ):
दिनांक २५ मे २०२६ रोजी देऊळगाव राजा शहर व परिसरात सोमवारी दुपारनंतर अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळे काही घरावरील टीन पत्रे उडाली तर वृक्ष उन्मळून ळून पडले.
देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा परिसरात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या फळबागा, भाजीपाला वर्गीय पिके उन्हाळी पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतामध्ये पाणी साचल्याने पिकाचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे काही घरावरील टीन पत्रे उडाली तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली. झाडे ऊन मिळून पडल्याने काही भागातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. देऊळगाव राजा शहरात सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास अवकाळी पाऊस व गारपिटीने अचानक हजेरी लावल्याने छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली बस स्थानक चौक, मुख्य बाजारपेठ, संजय नगर आणि रस्त्याकडेला व्यवसाय करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांची गारपिटीमुळे मोठी धावपळ झाली.
बाजार समितीतही शेतीमाल झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती. पावसाला सुरुवात होताच परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. उन्हाच्या उकड्यामुळे लोकांची लाही लाही होत होती परंतु अचानक आलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे काही अंशी उकड्यापासून सुटका मिळाली. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी बबनराव नागरे तालुका प्रतिनिधी देऊळगाव राजा यांचा रिपोर्ट.






















