Homeताज्या बातम्या२० वर्षांपासूनचा जमीन व कौटुंबिक वाद सामोपचाराने मिटला; गावासमोर सलोख्याचा आदर्श शिंगणापूर...

२० वर्षांपासूनचा जमीन व कौटुंबिक वाद सामोपचाराने मिटला; गावासमोर सलोख्याचा आदर्श शिंगणापूर पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्ष मोहनराव हंगे मार्डी गावचे पोलीस पाटील आप्पासाहेब गायकवाड यांच्याशिष्टाईने वाद मिटला

शिखर शिगणापुर (प्रतिनिधी धनंजय कावडे): मार्डी ता माण येथील सख्खे चुलत भाऊ श्री. सलीमभाई मुलाणी, श्री. नजीरभाई मुलाणी व श्री. पिरखान मुलाणी यांच्यामध्ये वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपावरून गेल्या सुमारे २० वर्षांपासून सुरू असलेला जमीन व कौटुंबिक वाद अखेर सामोपचाराने मिटला. पोलीस पाटील आप्पासो गायकवाड व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन हांगे यांच्या संयमी मध्यस्थीमुळे  दोन्ही बाजूंमध्ये यशस्वी समेट झाला.

वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटपावरून संबंधित कुटुंबांमध्ये अनेक वर्षांपासून न्यायालयीन वाद सुरू होते. तसेच काही जमिनी संयुक्त मालकीच्या असल्याने त्यावरूनही वारंवार मतभेद निर्माण होत होते. या वादातून अनेक वेळा एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी व गुन्हे दाखल करण्याची वेळही आली होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटील आप्पासो गायकवाड व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन हांगे यांनी दोन्ही पक्षांशी संयमाने संवाद साधत परस्पर समजूत काढली. अनेक बैठका आणि चर्चेनंतर दोन्ही बाजूंनी सलोख्याचा मार्ग स्वीकारत दीर्घकाळ चालत आलेल्या वादावर पडदा टाकला.

या सामोपचारामुळे केवळ दोन कुटुंबांतील वाद संपला नसून, संवाद, संयम आणि परस्पर विश्वास यांच्या माध्यमातून कितीही जुने मतभेद मिटवता येतात, याचा आदर्श गावासमोर निर्माण झाला आहे.

मार्डीसह परिसरातील नागरिकांनी जमीन, कौटुंबिक किंवा इतर कोणतेही वाद वर्षानुवर्षे न्यायालयात न ठेवता शक्य तेथे सामोपचाराने सोडविण्याचा प्रयत्न करावा. गावात सलोखा, ऐक्य आणि बंधुभाव जपणे हीच समाजाच्या प्रगतीची खरी दिशा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

*”वाद नव्हे, संवाद हवा; तंटा नव्हे, सलोखा हवा!”* हा संदेश या सामोपचारातून पुन्हा अधोरेखित झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीबीएसईचे तीन-भाषा धोरण जाहीर इयत्ता ७, ८, ९ च्या विद्यार्थ्यांना एकदाच दिलासा

0
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून तीन-भाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे सोमवारी जाहीर केली. या...

आसाम-अरुणाचलमध्ये महापुराचा कहर; २२ हजारांहून अधिक नागरिक बाधित

0
गुवाहाटी |आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने सोमवारीही थैमान सुरूच ठेवले असून, अचानक आलेल्या पुरामुळे दोन्ही राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसाममध्ये सहा जिल्ह्यांतील...

लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाईकामगार वारसांना न्याय द्या – विशेष बैठक घेण्याची मागणी

0
चंद्रपुर (प्रतीनिधी अमर चांदेकर) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सफाईकामगारांच्या वारसांना वारसाहक्क नोकरीचा लाभ मिळावा, यासाठी प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात...

लोहगड हत्याकांडात धक्कादायक खुलासा! ‘बसणं’ ठरलं मृत्यूचं संकेतचिन्ह

0
पुणे: पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात तपासाला रविवारी नवे वळण मिळाले. पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावर प्रत्यक्ष घटनास्थळी गुन्ह्याची पुनर्रचना...

सोशल मीडियामुळे वाढलेली दिखाऊ वृत्ती : वास्तवापासून दूर जाणाऱ्या समाजाचे बदलते चित्र.

0
✍️.....Nilesh Thakre आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया हा मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. Facebook, Instagram, YouTube, WhatsApp यांसारख्या माध्यमांनी जगाला एका क्लिकवर...

सीबीएसईचे तीन-भाषा धोरण जाहीर इयत्ता ७, ८, ९ च्या विद्यार्थ्यांना एकदाच दिलासा

0
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून तीन-भाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे सोमवारी जाहीर केली. या...

आसाम-अरुणाचलमध्ये महापुराचा कहर; २२ हजारांहून अधिक नागरिक बाधित

0
गुवाहाटी |आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने सोमवारीही थैमान सुरूच ठेवले असून, अचानक आलेल्या पुरामुळे दोन्ही राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसाममध्ये सहा जिल्ह्यांतील...

लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाईकामगार वारसांना न्याय द्या – विशेष बैठक घेण्याची मागणी

0
चंद्रपुर (प्रतीनिधी अमर चांदेकर) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सफाईकामगारांच्या वारसांना वारसाहक्क नोकरीचा लाभ मिळावा, यासाठी प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात...

लोहगड हत्याकांडात धक्कादायक खुलासा! ‘बसणं’ ठरलं मृत्यूचं संकेतचिन्ह

0
पुणे: पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात तपासाला रविवारी नवे वळण मिळाले. पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावर प्रत्यक्ष घटनास्थळी गुन्ह्याची पुनर्रचना...

सोशल मीडियामुळे वाढलेली दिखाऊ वृत्ती : वास्तवापासून दूर जाणाऱ्या समाजाचे बदलते चित्र.

0
✍️.....Nilesh Thakre आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया हा मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. Facebook, Instagram, YouTube, WhatsApp यांसारख्या माध्यमांनी जगाला एका क्लिकवर...
error: Content is protected !!