Times of Maharashtra Desk, : सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. काही दिवसांपासून महायुतीच्या राजकारणात मोठे बदल होताना दिसत आहेत. महायुतीत स्थानिक पातळीवर आरोप- प्रत्यारोप चालू असतानाच रायगड अलिबाग येथील आमदार महेंद्र दळवी यांनी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करत त्यांना डिवचले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या सिंचन घोटाळ्यावर भाष्य करत सुनील तटकरे यांना लोकसभेला केलेली मदत ही सर्वात मोठी चूक असून ती सुधारणे काळाची गरज आहे असा टोला आमदार महेंद्र दळवी यांनी कोलाड मधील पक्ष प्रवेश कार्यक्रमात लगावला आहे.
नेमक काय म्हणाले महेंद्र दळवी?
तटकरे यांच्या जुन्या भ्रष्टाचाराच्या बातम्या बाहेर काढत आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार महेंद्र दळवी म्हणाले की “महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती भयानक आहे. राज्यात सध्या विविध घोटाळे समोर येत आहेत हे घोटाळे निवडणूक येताच कसे समोर आले? असे म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्यांच्याच नेत्यांनी घात केला असा आरोप महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांचे नाव न घेत केला.
”सुनील तटकरे यांना लोकसभेला केलेली मदत आमची सर्वात मोठी चूक आहे. तटकरे यांना आम्ही लोकसभेला निवडून दिल पण त्यांना दिलेली ही माफी आमच्या अंगलट आली आहे. येणाऱ्या निवडणुकीत जर आमच्यावर त्यांनी दगा फटका केला तर असा प्रश्न उपस्थित करत तटकरे यांना सुरुंग लावण्याची गरज आहे”
महेंद्र दळवी यांच्या आरोपांमुळे रायगड येथील राजकरणारत या दोन्ही गटात चांगलीच स्पर्धा रंगणार असल्याची चिन्हे दिसत असून , हे दोन्ही गट आमने-सामने उभे राहणार का अशी चर्चा आहे.






















