Homeताज्या बातम्याशिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आदिवासी विकास मंत्री ना. प्रा. अशोक ऊईके यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात शिक्षण, आरक्षण, जात पडताळणी, तसेच विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.

निवेदनात धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करू नये, तर त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. तसेच जात पडताळणी प्रक्रियेत १९५० सालचा पुरावा मागितला जात असल्याने दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना अडचणी येत असून, १९८० पर्यंतचे उपलब्ध पुरावे ग्राह्य धरावेत, अशी मागणी करण्यात आली.

टी.आर.टी. पुणे यांनी जाहीर केलेल्या यादीत तफावत असल्याचा आरोप करत ती यादी पुन्हा गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करावी व बोगस उमेदवारांवर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली. स्वयंम योजनेअंतर्गत प्रलंबित अर्ज तातडीने मंजूर करावेत आणि पात्र विद्यार्थ्यांना डीबीटीची थकित रक्कम लवकरात लवकर वितरित करावी, यावरही भर देण्यात आला.

शिरपूर तालुक्यातील शिंगावे येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू करावी, तसेच कोडीद, उमर्दा व लौकी येथील आश्रम शाळांमध्ये इयत्ता ११वी-१२वीच्या अतिरिक्त तुकड्या सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. उमर्दा, जामन्यापाडा व खर्दे बुगा येथील शाळांसाठी शासकीय जागा व इमारती उपलब्ध करून देण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली.

या वेळी अॅड. दारासिंग पावरा, अॅड. रतिलाल वसावे, अॅड. समाधान भवरे, अॅड. जयसिंग पावरा, इंजि. किरण पावरा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!