मयूर साळवे, संघराज गायकवाड ( दौंड प्रतिनिधी ) : संत निरंकारी मिशन च्या वतीने दौंड येथे ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाचा चौथा टप्पा रविवारी (२२ फेब्रुवारी २०२६) उत्साहात पार पडला. परम श्रद्धेय सुदीक्षा माताजि महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ ते ११ या वेळेत देशभरातील १५०० हून अधिक ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. पुणे जिल्ह्यात इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा आदी नद्यांसह ४२ ठिकाणी स्वच्छता अभियान झाले.

दौंड येथे भीमा नदीकाठ व स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करण्यात आली. पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन असून त्याचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिंदर सुखीजा यांनी या उपक्रमाची माहिती दिली.
स्वच्छता अभियानानंतर त्याच ठिकाणी सत्संगाचे आयोजन करण्यात आले. बाह्य स्वच्छतेबरोबर अंतर्मन शुद्धीचाही संदेश देण्यात आला. दौंड ब्रांचचे मुखी शिवाजी होले यांनी उपस्थित सेवादारांचे आभार मानले.






















