विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : निसर्ग मित्र समिती व सार्वजनिक सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने १ मार्च रोजी जळगाव येथे राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद दुपारी १.३० वाजता अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे पार पडणार आहे. महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त संस्थांच्या पुढाकारातून स्व. आबासो रघुनाथ आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
परिषदेत सामाजिक, शैक्षणिक, कृषी, पर्यावरण, उद्योग, वैद्यकीय व शासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा “महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२६ तसेच पाच मान्यवरांना “महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार २०२६ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमास आमदार, खासदार, महापौर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.






















