Homeताज्या बातम्याबीडमध्ये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिम अंतिम टप्प्यात ; ९८ . ४२ टक्के...

बीडमध्ये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिम अंतिम टप्प्यात ; ९८ . ४२ टक्के गणना पत्रांचे वितरण पूर्ण , नागरिकांनी उर्वरित प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी – प्रशासनाचे आवाहन

 गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात सुरू असलेली विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम ( एस . आय . आर . ) आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून बीड तालुक्यातही हे अभियान वेगाने राबविण्यात येत आहे . मतदार यादी अधिक अचूक , अद्ययावत आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने महसूल प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू ठेवले असून अधिकारी , कर्मचारी , बी . एल . ओ . आणि नागरिक यांच्या सक्रिय सहभागामुळे कामाला मोठी गती मिळत आहे .
०५ ऑगस्ट रोजी दुपारी २ . ०० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार बीड तालुक्यातील ४ लाख ३६ हजार ५६७ मतदारांपैकी ४ लाख २९ हजार ६६५ गणना पत्रांचे वितरण पूर्ण झाले असून हे प्रमाण ९८ . ४२ टक्के इतके आहे . तसेच ३ लाख ४७ हजार ५२५ गणना पत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून एकूण प्रगती ९३ . ५२ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे . बीड विधानसभा मतदारसंघातही ९२ . ९२ टक्के एकूण प्रगती नोंदविण्यात आली असून जिल्हाभर विशेष पुनरीक्षण अभियान अंतिम टप्प्यात दाखल झाले आहे .
विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या अनुषंगाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी , विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन , उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनोज घोडे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी , उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बीड तालुक्यात विशेष नियोजन करण्यात आले आहे . प्रत्येक मतदान केंद्रावर बी . एल . ओ . यांच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संपर्क साधून गणना पत्रांचे वितरण , पडताळणी आणि डिजिटायझेशनची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जात आहे .
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी केली . यावेळी सहायक महसूल अधिकारी श्रीराम वायभट यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते . मतदान केंद्रावर उपलब्ध नोंदी , गणना पत्रांचे वितरण , नागरिकांची उपस्थिती , डिजिटायझेशनची स्थिती तसेच उर्वरित कामाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला . कामामध्ये अचूकता राखून कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही , याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या .
या केंद्रांवर बी . एल . ओ . सारिका चौहान आणि समाजसेवक सय्यद एजाज अली यांनी नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करून गणना पत्र भरण्याची प्रक्रिया सुलभ केली . नागरिकांच्या शंकांचे तत्काळ निरसन करून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली . त्यामुळे अनेक मतदारांनी त्याच ठिकाणी आपली प्रक्रिया पूर्ण केली . तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले की , विशेष संक्षिप्त पुनरीक्षण ही केवळ निवडणूक प्रक्रिया नसून लोकशाही अधिक सक्षम करण्याचे महत्त्वपूर्ण अभियान आहे . प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे . त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्याप गणना पत्र सादर केलेले नाही किंवा आवश्यक माहिती अद्ययावत केलेली नाही , त्यांनी उर्वरित मुदतीत तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी . बी . एल . ओ . यांना आवश्यक सहकार्य करून मतदार यादी अधिक अचूक व त्रुटीरहित करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवावा , असे आवाहन त्यांनी केले .
यावेळी उपस्थित नागरिकांनीही विशेष पुनरीक्षण मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाच्या कामकाजाचे कौतुक केले . समाजसेवक सय्यद एजाज अली , अझहर मोमीन , शेख इम्रान , सय्यद आसिफ अली , सय्यद माजीद जमा , नबील जमा यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते . त्यांनी मतदारांनी स्वतः पुढाकार घेऊन गणना पत्रे भरावीत आणि इतरांनाही यासाठी प्रोत्साहित करावे , असे आवाहन केले .
महसूल प्रशासनाने स्पष्ट केले आहे की , विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात प्रत्येक मतदान केंद्रावर अधिकारी आणि बी . एल . ओ . उपलब्ध असून नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत केली जात आहे . मतदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत बी . एल . ओ . किंवा संबंधित महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी . सर्व पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत अचूकपणे समाविष्ट व्हावीत आणि लोकशाही प्रक्रिया अधिक सक्षम व्हावी , यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीला विरोध; ब्रह्मपुरीत ओपीडी, आयपीडी ठप्प!

0
ब्रह्मपुरी राज्य शासनाने १ वर्षाचा मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स सीसीएमपी केलेल्या होमिओपॅथी बीएचएमएस डॉक्टरांना थेट महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये एमएमसी नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे या...

गावागावांत रेल्वेचा रणशिंग; ९ ऑगस्टला गोंदे फाट्यावर इतिहास घडविण्याचा निर्धार!

0
सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीच्या जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; वकील संघ, SIMAसह विविध सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा सिन्नर, दि. ६ ऑगस्ट: नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी...

दौंड शहरातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे भाजप महिला मोर्चाची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील मंजूर विकासकामे तातडीने सुरू करून अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी...

रक्षकांकडूनच भक्षकवृत्ती! पुणे लोहमार्ग मुख्यालयात महिला पोलिसांना रायफल व बांबूने अमानुष मारहाण

0
संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा; अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी स्वतः चौकशी करण्याची तीव्र मागणी पुणे (विशेष प्रतिनिधी):कायद्याचे रक्षण करण्याची आणि महिलांना सुरक्षा...

चंद्रपूर हादरले! ब्रम्हपुरी परिसरात इथेनॉल प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे चर्मरोगाचा उद्रेक; तब्बल १९८ बाधित.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) ब्रम्हपुरी परिसरातील इथेनॉल प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे स्थानिकांना त्वचारोग, अंगाला...

बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीला विरोध; ब्रह्मपुरीत ओपीडी, आयपीडी ठप्प!

0
ब्रह्मपुरी राज्य शासनाने १ वर्षाचा मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स सीसीएमपी केलेल्या होमिओपॅथी बीएचएमएस डॉक्टरांना थेट महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये एमएमसी नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे या...

गावागावांत रेल्वेचा रणशिंग; ९ ऑगस्टला गोंदे फाट्यावर इतिहास घडविण्याचा निर्धार!

0
सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीच्या जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; वकील संघ, SIMAसह विविध सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा सिन्नर, दि. ६ ऑगस्ट: नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी...

दौंड शहरातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे भाजप महिला मोर्चाची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील मंजूर विकासकामे तातडीने सुरू करून अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी...

रक्षकांकडूनच भक्षकवृत्ती! पुणे लोहमार्ग मुख्यालयात महिला पोलिसांना रायफल व बांबूने अमानुष मारहाण

0
संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा; अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी स्वतः चौकशी करण्याची तीव्र मागणी पुणे (विशेष प्रतिनिधी):कायद्याचे रक्षण करण्याची आणि महिलांना सुरक्षा...

चंद्रपूर हादरले! ब्रम्हपुरी परिसरात इथेनॉल प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे चर्मरोगाचा उद्रेक; तब्बल १९८ बाधित.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) ब्रम्हपुरी परिसरातील इथेनॉल प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे स्थानिकांना त्वचारोग, अंगाला...
error: Content is protected !!