Homeताज्या बातम्यादौंड शहरातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे भाजप महिला मोर्चाची...

दौंड शहरातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे भाजप महिला मोर्चाची मागणी

दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील मंजूर विकासकामे तातडीने सुरू करून अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा तथा दौंड शहर मंडळाच्या पदाधिकारी सौ. सरिता गौरव कुल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आमदार राहुलदादा कुल यांच्या माध्यमातून दौंड शहरातील नागरिकांसाठी विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. संबंधित कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही अनेक कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही, तर काही कामे अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे रखडलेल्या कामांना तातडीने गती देऊन ती दर्जेदार पद्धतीने व वेळेत पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनामध्ये बोरोवकेनगर ते सरपंच वस्ती मार्ग, सरपंच वस्ती ते बीजगुणन मार्ग तसेच पंचगंगा सोसायटी ते शिवराज नगर या प्रमुख रस्त्यांच्या कामांना त्वरित सुरुवात करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी निवेदन देताना सौ. सरिता कुल (उपाध्यक्षा, महिला मोर्चा, दौंड शहर मंडळ), मीना जाधव (उपाध्यक्षा, महिला मोर्चा, पुणे जिल्हा), राहुल भंडारी (उपाध्यक्ष, दौंड शहर), नागेश बेलूरकर (उपाध्यक्ष, दौंड शहर), रिया रामदासानी (उपाध्यक्षा, महिला मोर्चा, दौंड शहर) तसेच विक्रम कोऱ्हाळे, सागर कुंभार, राहुल आढाव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन रखडलेल्या विकासकामांना गती द्यावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीला विरोध; ब्रह्मपुरीत ओपीडी, आयपीडी ठप्प!

0
ब्रह्मपुरी राज्य शासनाने १ वर्षाचा मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स सीसीएमपी केलेल्या होमिओपॅथी बीएचएमएस डॉक्टरांना थेट महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये एमएमसी नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे या...

गावागावांत रेल्वेचा रणशिंग; ९ ऑगस्टला गोंदे फाट्यावर इतिहास घडविण्याचा निर्धार!

0
सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीच्या जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; वकील संघ, SIMAसह विविध सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा सिन्नर, दि. ६ ऑगस्ट: नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी...

रक्षकांकडूनच भक्षकवृत्ती! पुणे लोहमार्ग मुख्यालयात महिला पोलिसांना रायफल व बांबूने अमानुष मारहाण

0
संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा; अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी स्वतः चौकशी करण्याची तीव्र मागणी पुणे (विशेष प्रतिनिधी):कायद्याचे रक्षण करण्याची आणि महिलांना सुरक्षा...

चंद्रपूर हादरले! ब्रम्हपुरी परिसरात इथेनॉल प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे चर्मरोगाचा उद्रेक; तब्बल १९८ बाधित.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) ब्रम्हपुरी परिसरातील इथेनॉल प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे स्थानिकांना त्वचारोग, अंगाला...

‘शारदा हॉस्पिटल’चा शुभारंभ व वर्धापन आज गेवराईत आधुनिक उपचारपद्धतीचा विस्तार

0
 गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) गेवराई, व शहर व परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणाऱ्या डॉ. प्रदीप व डॉ. प्रियंका राठोड...

बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीला विरोध; ब्रह्मपुरीत ओपीडी, आयपीडी ठप्प!

0
ब्रह्मपुरी राज्य शासनाने १ वर्षाचा मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स सीसीएमपी केलेल्या होमिओपॅथी बीएचएमएस डॉक्टरांना थेट महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये एमएमसी नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे या...

गावागावांत रेल्वेचा रणशिंग; ९ ऑगस्टला गोंदे फाट्यावर इतिहास घडविण्याचा निर्धार!

0
सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीच्या जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; वकील संघ, SIMAसह विविध सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा सिन्नर, दि. ६ ऑगस्ट: नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी...

रक्षकांकडूनच भक्षकवृत्ती! पुणे लोहमार्ग मुख्यालयात महिला पोलिसांना रायफल व बांबूने अमानुष मारहाण

0
संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा; अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी स्वतः चौकशी करण्याची तीव्र मागणी पुणे (विशेष प्रतिनिधी):कायद्याचे रक्षण करण्याची आणि महिलांना सुरक्षा...

चंद्रपूर हादरले! ब्रम्हपुरी परिसरात इथेनॉल प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे चर्मरोगाचा उद्रेक; तब्बल १९८ बाधित.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) ब्रम्हपुरी परिसरातील इथेनॉल प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे स्थानिकांना त्वचारोग, अंगाला...

‘शारदा हॉस्पिटल’चा शुभारंभ व वर्धापन आज गेवराईत आधुनिक उपचारपद्धतीचा विस्तार

0
 गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) गेवराई, व शहर व परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणाऱ्या डॉ. प्रदीप व डॉ. प्रियंका राठोड...
error: Content is protected !!