Times of Maharashtra Desk Maharashtra Helth Update : या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अनियमित पासून आणि वातावरणाच्या बदलामुळे बरेच आजार पसरले आहेत. पण या सर्वात मुंबईवर आजाराने वेळखा घातल्याचे दिसत आहेत. मुंबई सह संपूर्ण राज्यात साथीच्या आजाराची साथ पसरली आहे. अनियमतीत पाऊस, रस्त्यावर सचणारे पाणी , नाल्यात आडकेला कचरा यामुळे दासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे राज्यात मलेरिया , डेंग्यू , चिकनगुनिया यांसारखे आजार पसरत आहेत.
यावर्षी मे महिना म्हणजे पावसाळ्याच्या १ महिना आधीच पाऊस पडण्यास सुरवात झाली होती, हा पाऊस आगदी आता पर्यन्त म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडीपर्यंत सुरू होता. या कालावधीत वातावरणात देखील बराच बद्दल झाला. आता सध्या पाऊस परतला असला तरी बऱ्याच प्रकारचे आजार पसरत आहेत. आता पर्यन्त राज्यात ३९,७१८ रुग्णांची नोंद झाली असून ३८ रुग्ण या आजारचे बळी ठरले आहेत.
राज्यात आरोग्य यंत्रणा सतर्क
मुंबईसह राज्यात मलेरिया आणि डेंग्यू या आजारांनी हैढोस घातला आहे. ग्रामीण आणि काही शहरी भागात गंभीर परिस्थिति निर्माण झाली आहे.आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात मलेरियाचे 20,166 रुग्ण आणि 15 मृत्यू, तर डेंग्यूचे 12,351 रुग्ण ७ नोव्हेंबर पर्यन्त नोंदवले गेले आहेत तर कॉलराचे 191, पिवळा तापचे 687, गॅस्ट्रोएन्टरायटिसचे 43, अतिसार 1,234 आणि टायफॉईडचे 22 रुग्ण आढळले आहेत तर बर्ड फ्लूचीचे 73 रुग्णाची नोंद आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून आजार पसरू नये म्हणून काळजी घेतली जात आहे.
महाराष्ट्र राज्यात आजारांवर नियंत्रणासाठी सात सूत्री आराखडा
आरोग्य विभागाने या आजारांवर नियंत्र ठेवण्यासाठी आता पाऊले उचलायला सुरवात केली आहे. यासाठी त्यांनी सात सूत्री आराखडा तयार केला आहे. यात जलद सर्वेक्षण, कीटक नियंत्रण, फॉगिंग, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण मोहिमांचा समावेश आहे. स्वाईन फ्लू, लेप्टोस्पायरोसिस, स्क्रब टायफस, इन्फ्लुएंझा व बर्ड फ्लूवरील नियंत्रणासाठीही स्वतंत्र कृती आराखडे तयार करण्यात आले आहेत. सर्व जिल्ह्यांत आरोग्य निरीक्षण वाढविण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी सांगितले.
मुंबई आजाराच्या बाबतीत अव्वल
राज्यातील आकडेवारी पाहता सर्वात जास्त रुग्ण संख्या मुंबईत आढळून आली आहे. वर्षाच्या सुरवातीलाच म्हणजे जानेवारी पासून मुंबईत मलेरियाचे तब्बल 8,697 आणि डेंग्यूचे 5,246 रुग्ण नोंदले गेले आहेत. चिकनगुनियाचे 726 रुग्ण असून,. शहरातील घनदाट लोकसंख्या, ओलसर हवामान आणि साचलेले पाणी यामुळे दासांची संख्या वाढत आहे.



















