Homeमहाराष्ट्रवाजे विद्यालयात राजाराम सोनवणे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात; कार्याचा गौरव

वाजे विद्यालयात राजाराम सोनवणे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात; कार्याचा गौरव

सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) : येथील वाजे विद्यालयातील ज्येष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक राजाराम सोनवणे यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला. अनेक वर्षांच्या सेवेत त्यांनी प्रामाणिकपणा, निष्ठा आणि जबाबदारीची जपणूक करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे यावेळी मान्यवरांनी अधोरेखित केले.

मुख्याध्यापक रामनाथ रायते यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सोनवणे यांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. प्रयोगशाळेतील उपकरणांची योग्य देखभाल, प्रयोगांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच शिक्षकांना सातत्याने सहकार्य या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचा शांत, संयमी आणि सहकार्यशील स्वभाव हा विद्यालयासाठी प्रेरणादायी ठरला असून त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी शिक्षक महेंद्र आढाव यांनीही सोनवणे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान सोनवणे यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

आपल्या मनोगतात सोनवणे यांनी विद्यालयाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते व्यक्त करत सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. “विद्यालय हीच माझी खरी ओळख आहे,” असे भावनिक शब्द त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन निशिगंधा सोनवणे यांनी केले. या प्रसंगी उपमुख्याध्यापिका मंगला हांडे, पर्यवेक्षक पांडुरंग करपे, विजयानंद कुमावत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!