शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे): करवंद नाका जनसंपर्क कार्यालयात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन; उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप
येथील शिरपूर शिवसेना जनसंपर्क कार्यालय, करवंद नाका येथे शिवसेना या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक व विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे यशस्वी *उपमुख्यमंत्री व शिवसेना अध्यक्ष माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब* यांच्या आदेशान्वये आणि शिवसेना लोकसभा क्षेत्र प्रमुख माजी आमदार शिरीष दादा चौधरी व धुळे *जिल्हाप्रमुख सतीशजी महाले तात्यासाहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन: कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांनी वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांना आणि स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
रुग्णालयात मोफत फळ वाटप: वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांची विचारपूस करत त्यांना मोफत फळ वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमात शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक *डॉ. पावरा साहेब* हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते.
शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अफाट उपस्थिती: या संपूर्ण कार्यक्रमास शिवसेनेचे तालुकाप्रमुख हेमंतभाऊ पाटील, आदिवासी आघाडी जिल्हाप्रमुख श्री वसंजी पावरा,ज्येष्ठ नेते राजूअण्णा गिरासे, माजी नगरसेवक पांडुरंग माळी, ज्येष्ठ नेते भाईदास आबा पाटील, शहर प्रमुख विकी चौधरी आणि शिवसेनेचे SIR चे तालुका प्रमुख कल्पेशसिंह राजपूत आणि शिवसेना महिला आघाडीच्या अंकिता बडगुजर, सपना जोरावर
तसेच युवासेनेचे दिनेशभाऊ कोळी, शिरपूर तालुका अल्पसंख्यांक प्रमुख सलमान काझी यांची प्रमुख उपस्थिती होती
तसेच , धीरज राजपूत, प्रसाद पाटील, शुभम पाटील, हितेश पाटील, इमरान शेख, इकरार शेख, दिनेश कोळी, प्रेमसिंग जमादार, सलमान काजी, शुभम पाटील, आकीक अहिरेकर, हितेश पाटील, भोला पाटील, योगेश जोरावर, आफिक शेख, बलक शेख, मगन पाटील, हेमंत बोरसे, निलेश कोळी, राधे चौधरी, गिरीश सनेर, अरविंद बोरसे, गणेश चौधरी, अमन कटारिया, प्रमोद पाटील, पंकज पाटील, गणेश माळी यांच्यासह युवासेना व शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ अशा घोषणांनी करवंद नाका परिसर दणाणून गेला होता.






















