Homeक्राईमCM Rekha Gupta Attack:"दिल्ली मुख्यमंत्री हल्ला प्रकरण: आरोपपत्र सत्र न्यायालयात, सुनावणी १५...

CM Rekha Gupta Attack:”दिल्ली मुख्यमंत्री हल्ला प्रकरण: आरोपपत्र सत्र न्यायालयात, सुनावणी १५ डिसेंबरपर्यंत ढकलली”

Times of Maharashtra Desk, CM Rekha Gupta Attack : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात, मागील सुनावणीत कनिष्ठ न्यायालयाने आरोपी राजेशभाई खिमजी यांच्याविरुद्ध दाखल केलेले आरोपपत्र सत्र न्यायालयात पाठवले होते.या विषयी पुढची सुनावणी तीस हजारी न्यायालयात शनिवारी (२१ नोव्हेंबर) होणार होती ती आता १५ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दिल्ली पोलिस या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. अलीकडेच, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात आरोपी राजेशभाई खिमजी आणि सय्यद तशीन रझा या दोघांविरुद्ध तीस हजारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.यामुळे प्रकरण आता उच्च न्यायालयीन स्तरावर गेले असून, पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध औपचारिक आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया पुढे चालू केली आहे.

नक्की प्रकरण काय? तपासात काय समोर आले?
दिल्ली मुख्यमंत्री रेखा आपल्या सरकारी निवासस्थानी जनसुनावणी घेत असताना गुजरातचे राजेश खिमजी यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. ही घटना २० ऑगस्टला घडली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला लगेच पकडले आणि सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली . चौकशीत राजेश खिमजी यांनी सांगितले की भटक्या कुत्र्यांच्या समस्येमुळे ते रागावले होते आणि त्यामुळे त्यांनी हल्ला केला. त्यांनी जारी हल्ल्याचे कारण सांगितले असले तरी या विषयी तपास अद्याप सुरू असून पोलिसाना या तपासात यश मिळाले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री हल्ल्याच्या प्रकरणाचा तपास जवळजवळ पूर्ण झाला आहेतपासादरम्यान, राजेश खिमजीचा सहकारी सय्यद तशीन रझा हा हल्ल्यात सहभागी असल्याचेही समोर आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सय्यदने राजेशला हल्ल्याचा कट रचण्यास मदत केली होती. पोलिसांनी आरोपींविरुद्ध आवश्यक असलेले सर्व पुरावे गोळा केले आहेत. कायदेशीर प्रक्रिया आता सत्र न्यायालयात पूर्ण केली जाईल, जिथे दोन्ही आरोपींवर खटला चालवला जाईल.दंडाधिकारी न्यायालयाने आरोपपत्र सत्र न्यायालयात हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. आरोपपत्रात आरोपींविरुद्ध हल्ला, सुरक्षा दलांना अडथळा आणणे आणि कट रचणे यासारखे गंभीर आरोप आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...
error: Content is protected !!