Times of Maharashtra Desk, Jaykumar Rawal: धुळे जिल्ह्यातील सर्वात जास्त ७० हजार मतदार असलेलेल्या दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेत इतिहासिक घटना घडली आहे. राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांना दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेची निवडणूक पूर्णतः बिनविरोध करण्यात यश आले आहे. दोंडाई येथे नगरसेवक व सोबतच एकूण 13 प्रभागातील सर्व 26 जागांवर बीजेपीने आपला झेंडा फडकावला आहे.
भाजपाच्या विरोधात वेगवेगळ्या प्रभागातून शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, एम.आय.एम. , समाजवादी पार्टी, अपक्ष अशा विविध पक्षांकडून उमेदवार उभे करण्यात आले होते. परतू या सर्व पक्षांच्या उमेडवरणी उमेदवारी आर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे गेल्या ७३ वर्षात दोंडाईची नगर परिषदेची निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध झाली आहे.तसेच १९५२ साली स्थापन झालेल्या दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेची निवडणूक प्रथमच बिनविरोध पार पडली आहे.
जयकुमार रावलांचे हटके राजकारण.
दोंडाई येथे जयकुमार रावलांच्या राजकीय रणणीतील यश आले असून सर्वात प्रथम त्यांनी दोंडाईचा नगर परिषदेच्या निवडणुकीत गेल्या 40 वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष संपवला आणि डॉ. हेमंत देशमुख यांना भाजपात सामील करून घेतले.त्यानंतर नगराध्यक्ष नयनकुंवरताई रावल आणि 7 जागा बिनविरोध निवडून आल्या. माघारीच्या शेवटच्या दिवशी उर्वरित 19 जागाही भाजपच्या उमेदवारांना बिनविरोध मिळाल्या. या बदलामुळे नगर परिषदेतील राजकीय संघर्ष संपला आणि बिनविरोध निवडणुकीच्या मार्गात त्यांना यश मिळाले. दोंडाई बीजेपीला यश मिळाले असले तरी दुसरीकडे जयकुमार रावलांच्या राजकारणावर प्रश्न उचलला जात आहे. मंत्री जयकुमार अमोल यांनी अशी कोणती राजकीय समीकरणे फिरवली की ज्यामुळे महाविकास आघाडीसह सर्वच विरोधी पक्षांच्या उमेदवारांना आपलं उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.






















