Times of Maharashtra Desk, CM Rekha Gupta Attack : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात, मागील सुनावणीत कनिष्ठ न्यायालयाने आरोपी राजेशभाई खिमजी यांच्याविरुद्ध दाखल केलेले आरोपपत्र सत्र न्यायालयात पाठवले होते.या विषयी पुढची सुनावणी तीस हजारी न्यायालयात शनिवारी (२१ नोव्हेंबर) होणार होती ती आता १५ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दिल्ली पोलिस या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. अलीकडेच, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात आरोपी राजेशभाई खिमजी आणि सय्यद तशीन रझा या दोघांविरुद्ध तीस हजारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.यामुळे प्रकरण आता उच्च न्यायालयीन स्तरावर गेले असून, पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध औपचारिक आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया पुढे चालू केली आहे.
नक्की प्रकरण काय? तपासात काय समोर आले?
दिल्ली मुख्यमंत्री रेखा आपल्या सरकारी निवासस्थानी जनसुनावणी घेत असताना गुजरातचे राजेश खिमजी यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. ही घटना २० ऑगस्टला घडली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला लगेच पकडले आणि सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली . चौकशीत राजेश खिमजी यांनी सांगितले की भटक्या कुत्र्यांच्या समस्येमुळे ते रागावले होते आणि त्यामुळे त्यांनी हल्ला केला. त्यांनी जारी हल्ल्याचे कारण सांगितले असले तरी या विषयी तपास अद्याप सुरू असून पोलिसाना या तपासात यश मिळाले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री हल्ल्याच्या प्रकरणाचा तपास जवळजवळ पूर्ण झाला आहेतपासादरम्यान, राजेश खिमजीचा सहकारी सय्यद तशीन रझा हा हल्ल्यात सहभागी असल्याचेही समोर आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सय्यदने राजेशला हल्ल्याचा कट रचण्यास मदत केली होती. पोलिसांनी आरोपींविरुद्ध आवश्यक असलेले सर्व पुरावे गोळा केले आहेत. कायदेशीर प्रक्रिया आता सत्र न्यायालयात पूर्ण केली जाईल, जिथे दोन्ही आरोपींवर खटला चालवला जाईल.दंडाधिकारी न्यायालयाने आरोपपत्र सत्र न्यायालयात हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. आरोपपत्रात आरोपींविरुद्ध हल्ला, सुरक्षा दलांना अडथळा आणणे आणि कट रचणे यासारखे गंभीर आरोप आहेत.





















