Homeक्राईमविश्रांतवाडीतील १७ वर्षीय मुलाचा अपहरण करून निर्घृण खून; पाच आरोपी ताब्यात

विश्रांतवाडीतील १७ वर्षीय मुलाचा अपहरण करून निर्घृण खून; पाच आरोपी ताब्यात

Times of Maharashtra Desk: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा अपहरण करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खेड शिवापूर परिसरातील डोंगरात बुधवारी दुपारी या मुलाचा मृतदेह आढळून आला. अमनसिंग सुरेंद्रसिंह गचंड (वय १७, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यामध्ये दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. मुख्य आरोपी प्रथमेश चिंधू आढळ (वय १९, रा. उत्तमनगर) आणि नागेश बालाजी धबाले (वय १९, रा. शिवणे) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात एकूण ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्या वादातून खुनाचा कट

पोलिस तपासानुसार, सप्टेंबर २०२५ मध्ये अमनसिंग आणि प्रथमेश यांच्यात वाद झाला होता. त्या वादात अमनसिंगकडून झालेल्या मारहाणीत प्रथमेश जखमी झाला होता. याच रागातून प्रथमेशने अमनसिंगचा खून करण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.अमनसिंग विश्रांतवाडी परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपींनी सोशल मीडियाचा वापर करून त्याला सापळ्यात ओढले. एका तरुणीच्या नावाने इन्स्टाग्रामवर संपर्क साधून २९ डिसेंबर रोजी त्याला खेड शिवापूर येथील वर्तुमुख मंदिर परिसरात बोलावण्यात आले.

खेड शिवापूरच्या डोंगरात हत्या

अमनसिंग मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आरोपींनी त्याला डोंगर परिसरात नेले. तेथे आधीच कटात सहभागी असलेले इतर आरोपी उपस्थित होते. चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अमनसिंगला शेवटची इच्छा विचारली होती. त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून आणि दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मृतदेह खड्ड्यात पुरून आरोपी फरार झाले.

बेपत्ता तक्रारीनंतर उघडकीस आले प्रकरण
२९ डिसेंबर रोजी सकाळी घरातून बाहेर पडलेला अमनसिंग रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दुसऱ्या दिवशी त्याच्या आईने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. गुन्हे शाखा युनिट-३ आणि विश्रांतवाडी पोलिसांनी समांतर तपास करत कर्नाटकातील बेळगाव येथून मुख्य आरोपींना ताब्यात घेतले.चौकशीत आरोपींनी खुनाची कबुली दिल्यानंतर बुधवारी सायंकाळी खेड शिवापूरच्या डोंगरात खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब झालेली होती.या प्रकरणाचा पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस आणि गुन्हे शाखा करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विकासाच्या गजरात हरवलेला माणूस : भारताच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह!

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): भारत प्रगतीच्या वाटेवर असल्याचे दावे रोज ऐकायला मिळतात. तंत्रज्ञान, उद्योग, महामार्ग, डिजिटल क्रांती यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र...

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; विधवा ऐवजी ‘एकल महिला’ संज्ञेचा वापर...

0
दौंड (प्रतिनिधी तुषार शेटे):संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन संपूर्ण महाराष्ट्रात "एकल महिला दिवस" म्हणून साजरा करण्यात यावा असे निर्देश...

गुळवंच येथे परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): परंपरागत कृषि विकास योजना (पीकेव्हीवाय) अंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम...

“महा-उपलब्धी” मोबाईल ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या सेवा; शासनाचा डिजिटल प्रशासनाकडे महत्त्वपूर्ण टप्पा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी "महा-उपलब्धी" हे एकात्मिक मोबाईल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ते...

योग : भारतीय संस्कृतीचा अमर वारसा आणि आधुनिक जीवनाची संजीवनी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): मानवाच्या जीवनप्रवासात शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखण्याची कला म्हणजे योग. हजारो वर्षांपूर्वी भारतभूमीत जन्माला आलेली ही जीवनपद्धती आज...

विकासाच्या गजरात हरवलेला माणूस : भारताच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह!

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): भारत प्रगतीच्या वाटेवर असल्याचे दावे रोज ऐकायला मिळतात. तंत्रज्ञान, उद्योग, महामार्ग, डिजिटल क्रांती यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र...

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; विधवा ऐवजी ‘एकल महिला’ संज्ञेचा वापर...

0
दौंड (प्रतिनिधी तुषार शेटे):संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन संपूर्ण महाराष्ट्रात "एकल महिला दिवस" म्हणून साजरा करण्यात यावा असे निर्देश...

गुळवंच येथे परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): परंपरागत कृषि विकास योजना (पीकेव्हीवाय) अंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम...

“महा-उपलब्धी” मोबाईल ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या सेवा; शासनाचा डिजिटल प्रशासनाकडे महत्त्वपूर्ण टप्पा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी "महा-उपलब्धी" हे एकात्मिक मोबाईल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ते...

योग : भारतीय संस्कृतीचा अमर वारसा आणि आधुनिक जीवनाची संजीवनी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): मानवाच्या जीवनप्रवासात शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखण्याची कला म्हणजे योग. हजारो वर्षांपूर्वी भारतभूमीत जन्माला आलेली ही जीवनपद्धती आज...
error: Content is protected !!