Homeताज्या बातम्यापुणे महापालिका निवडणूक: लहू बालवडकर महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून येतील – चंद्रकांत...

पुणे महापालिका निवडणूक: लहू बालवडकर महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून येतील – चंद्रकांत पाटील यांची भविष्यवाणी

Times of Maharashtra Desk: पुणे महानगरपालिका निवडणूक विविध वाद आणि घडामोडींमुळे राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर अमोल बालवडकर यांनी थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली, तर भाजपने या जागेसाठी लहू बालवडकर यांना उमेदवारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिका निवडणुकीबाबत मोठे भाकीत केले आहे.
लहू बालवडकर यांच्या प्रचारादरम्यान बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी आज भविष्यवाणी करतो की महाराष्ट्रातील सर्वाधिक मतं घेऊन जो नगरसेवक निवडून येईल, तो लहू बालवडकर असेल.” त्यांनी आपल्या मागील निवडणुकांमधील अंदाजांचा उल्लेख करत आपल्या भविष्यवाण्या आजवर अचूक ठरल्याचा दावा केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, “जेव्हा-जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा मोठे-मोठे नेते मला विचारतात ‘दादा, काय होईल?’ आणि मी जे सांगतो ते खरं ठरतं. २०१७ साली मी मुंबई महापालिकेत ८२ जागा येतील असं सांगितलं होतं आणि तितक्याच जागा आल्या.”

बालेवाडी प्रभागाबाबत बोलताना त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केला की, “लहू बालवडकर हे बालेवाडीमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून येतील. लिहून ठेवा, महाराष्ट्रात सर्वाधिक मतं मिळवणारे नगरसेवक लहू बालवडकरच असतील.”लहू बालवडकर यांचं नाव ईव्हीएमवर चौथ्या क्रमांकावर असलं, तरी त्याचा निकालावर कोणताही परिणाम होणार नाही, असं सांगत पाटील म्हणाले, “घोडा मैदान लांब नाही. निकालाच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल.”चंद्रकांत पाटील यांच्या या विधानामुळे पुणे महापालिका निवडणुकीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता असून, आता मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विकासाच्या गजरात हरवलेला माणूस : भारताच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह!

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): भारत प्रगतीच्या वाटेवर असल्याचे दावे रोज ऐकायला मिळतात. तंत्रज्ञान, उद्योग, महामार्ग, डिजिटल क्रांती यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र...

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; विधवा ऐवजी ‘एकल महिला’ संज्ञेचा वापर...

0
दौंड (प्रतिनिधी तुषार शेटे):संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन संपूर्ण महाराष्ट्रात "एकल महिला दिवस" म्हणून साजरा करण्यात यावा असे निर्देश...

गुळवंच येथे परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): परंपरागत कृषि विकास योजना (पीकेव्हीवाय) अंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम...

“महा-उपलब्धी” मोबाईल ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या सेवा; शासनाचा डिजिटल प्रशासनाकडे महत्त्वपूर्ण टप्पा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी "महा-उपलब्धी" हे एकात्मिक मोबाईल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ते...

योग : भारतीय संस्कृतीचा अमर वारसा आणि आधुनिक जीवनाची संजीवनी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): मानवाच्या जीवनप्रवासात शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखण्याची कला म्हणजे योग. हजारो वर्षांपूर्वी भारतभूमीत जन्माला आलेली ही जीवनपद्धती आज...

विकासाच्या गजरात हरवलेला माणूस : भारताच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह!

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): भारत प्रगतीच्या वाटेवर असल्याचे दावे रोज ऐकायला मिळतात. तंत्रज्ञान, उद्योग, महामार्ग, डिजिटल क्रांती यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र...

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; विधवा ऐवजी ‘एकल महिला’ संज्ञेचा वापर...

0
दौंड (प्रतिनिधी तुषार शेटे):संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन संपूर्ण महाराष्ट्रात "एकल महिला दिवस" म्हणून साजरा करण्यात यावा असे निर्देश...

गुळवंच येथे परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): परंपरागत कृषि विकास योजना (पीकेव्हीवाय) अंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम...

“महा-उपलब्धी” मोबाईल ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या सेवा; शासनाचा डिजिटल प्रशासनाकडे महत्त्वपूर्ण टप्पा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी "महा-उपलब्धी" हे एकात्मिक मोबाईल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ते...

योग : भारतीय संस्कृतीचा अमर वारसा आणि आधुनिक जीवनाची संजीवनी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): मानवाच्या जीवनप्रवासात शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखण्याची कला म्हणजे योग. हजारो वर्षांपूर्वी भारतभूमीत जन्माला आलेली ही जीवनपद्धती आज...
error: Content is protected !!