Homeताज्या बातम्यापुणे महापालिका निवडणूक: लहू बालवडकर महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून येतील – चंद्रकांत...

पुणे महापालिका निवडणूक: लहू बालवडकर महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून येतील – चंद्रकांत पाटील यांची भविष्यवाणी

Times of Maharashtra Desk: पुणे महानगरपालिका निवडणूक विविध वाद आणि घडामोडींमुळे राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर अमोल बालवडकर यांनी थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली, तर भाजपने या जागेसाठी लहू बालवडकर यांना उमेदवारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिका निवडणुकीबाबत मोठे भाकीत केले आहे.
लहू बालवडकर यांच्या प्रचारादरम्यान बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी आज भविष्यवाणी करतो की महाराष्ट्रातील सर्वाधिक मतं घेऊन जो नगरसेवक निवडून येईल, तो लहू बालवडकर असेल.” त्यांनी आपल्या मागील निवडणुकांमधील अंदाजांचा उल्लेख करत आपल्या भविष्यवाण्या आजवर अचूक ठरल्याचा दावा केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, “जेव्हा-जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा मोठे-मोठे नेते मला विचारतात ‘दादा, काय होईल?’ आणि मी जे सांगतो ते खरं ठरतं. २०१७ साली मी मुंबई महापालिकेत ८२ जागा येतील असं सांगितलं होतं आणि तितक्याच जागा आल्या.”

बालेवाडी प्रभागाबाबत बोलताना त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केला की, “लहू बालवडकर हे बालेवाडीमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून येतील. लिहून ठेवा, महाराष्ट्रात सर्वाधिक मतं मिळवणारे नगरसेवक लहू बालवडकरच असतील.”लहू बालवडकर यांचं नाव ईव्हीएमवर चौथ्या क्रमांकावर असलं, तरी त्याचा निकालावर कोणताही परिणाम होणार नाही, असं सांगत पाटील म्हणाले, “घोडा मैदान लांब नाही. निकालाच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल.”चंद्रकांत पाटील यांच्या या विधानामुळे पुणे महापालिका निवडणुकीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता असून, आता मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे मनपाचे उप अभियंता राजेश खाडे यांच्या ‘बोगस’ जीआरचा आधार? जाब विचारताच मनपाच्या बांधकाम...

0
Times Of Maharashtra Desk पुणे : अनधिकृत बांधकामाविरोधात दिलेल्या तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी वेगळ्याच विभागाच्या शासन निर्णयाचा आधार घेत नागरिकांना गोंधळात टाकण्याचा प्रकार पुणे महानगरपालिका...

निफाडमध्ये शिव पाणंद शेतरस्ते मोहिमेला वेग; एकाच दिवशी सात गावांची मोजणी पूर्ण

0
नाशिक (प्रतिनिधी योगेश कर्डिले) :  निफाड तालुक्यात शिव पाणंद शेतरस्ते चळवळीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, कागदावर असलेले शासन निर्णय आता प्रत्यक्षात उतरू...

भुसावळ नगराध्यक्ष अपात्र! जात प्रमाणपत्र वादामुळे गायत्री भंगाळे यांना मोठा धक्का

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : भुसावळ नगरपरिषदेत मोठी राजकीय उलथापालथ घडली असून नगराध्यक्ष गायत्री रूपचंद गोर उर्फ गायत्री चेतन भंगाळे यांना पदावरून अपात्र ठरवण्यात आले...

लोणेरे हत्याकांडाला वेग: आरोपी न्यायालयीन कोठडीत, कठोर कलमांखाली खटला तीव्र

0
लोणेरे-अलिबाग (प्रतिनिधी जयेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या लोणेरे येथील पल्लवी मोरे हत्याकांडाचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिस मोहम्मद...

नसरापूर प्रकरणावर संताप: दौंडमध्ये ABVP कडून राष्ट्रपतींना निवेदन, कठोर शिक्षेची मागणी

0
Times Of Maharashtra Desk :  दौंड : नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेविरोधात राज्यभर संताप व्यक्त होत असताना, दौंडमध्येही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले...

पुणे मनपाचे उप अभियंता राजेश खाडे यांच्या ‘बोगस’ जीआरचा आधार? जाब विचारताच मनपाच्या बांधकाम...

0
Times Of Maharashtra Desk पुणे : अनधिकृत बांधकामाविरोधात दिलेल्या तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी वेगळ्याच विभागाच्या शासन निर्णयाचा आधार घेत नागरिकांना गोंधळात टाकण्याचा प्रकार पुणे महानगरपालिका...

निफाडमध्ये शिव पाणंद शेतरस्ते मोहिमेला वेग; एकाच दिवशी सात गावांची मोजणी पूर्ण

0
नाशिक (प्रतिनिधी योगेश कर्डिले) :  निफाड तालुक्यात शिव पाणंद शेतरस्ते चळवळीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, कागदावर असलेले शासन निर्णय आता प्रत्यक्षात उतरू...

भुसावळ नगराध्यक्ष अपात्र! जात प्रमाणपत्र वादामुळे गायत्री भंगाळे यांना मोठा धक्का

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : भुसावळ नगरपरिषदेत मोठी राजकीय उलथापालथ घडली असून नगराध्यक्ष गायत्री रूपचंद गोर उर्फ गायत्री चेतन भंगाळे यांना पदावरून अपात्र ठरवण्यात आले...

लोणेरे हत्याकांडाला वेग: आरोपी न्यायालयीन कोठडीत, कठोर कलमांखाली खटला तीव्र

0
लोणेरे-अलिबाग (प्रतिनिधी जयेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या लोणेरे येथील पल्लवी मोरे हत्याकांडाचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिस मोहम्मद...

नसरापूर प्रकरणावर संताप: दौंडमध्ये ABVP कडून राष्ट्रपतींना निवेदन, कठोर शिक्षेची मागणी

0
Times Of Maharashtra Desk :  दौंड : नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेविरोधात राज्यभर संताप व्यक्त होत असताना, दौंडमध्येही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले...
error: Content is protected !!