Homeताज्या बातम्याबजेट 2026 वर शिक्कामोर्तब: 1 फेब्रुवारीलाच अर्थसंकल्प सादर होणार

बजेट 2026 वर शिक्कामोर्तब: 1 फेब्रुवारीलाच अर्थसंकल्प सादर होणार

Times of Maharashtra Desk: जसजसा जानेवारी महिना पुढे सरकत आहे, तसतशी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत देशभरात उत्सुकता वाढताना दिसत आहे. मागील काही वर्षांपासून दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजीच केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा सुरू आहे. यंदा मात्र 1 फेब्रुवारी हा दिवस रविवारी येत असल्याने अर्थसंकल्पाच्या तारखेबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते.मात्र केंद्र सरकारने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला असून, केंद्रीय अर्थसंकल्प 2026 हा ठरल्याप्रमाणे 1 फेब्रुवारी रोजीच सादर केला जाणार आहे, असे स्पष्ट केले आहे. रविवार असल्याने अर्थसंकल्पाच्या तारखेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

बजेट सत्राच्या तारखांना मंजुरी
अलीकडेच झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेयर्सच्या बैठकीत बजेट सत्राशी संबंधित महत्त्वाच्या तारखांना मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार,
28 जानेवारी रोजी राष्ट्रपतींचे अभिभाषण होणार आहे.29 जानेवारी रोजी संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल.त्यानंतर 1 फेब्रुवारी, रविवार रोजी अर्थमंत्री संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मांडतील.

निर्मला सीतारमण यांचा नववा अर्थसंकल्प
या वेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपला नववा अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत त्यांनी 2 अंतरिम आणि 6 पूर्ण असे एकूण 8 अर्थसंकल्प मांडले आहेत. यंदाचा अर्थसंकल्प सादर करताच त्या माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचा विक्रम मागे टाकतील आणि पी. चिदंबरम यांनी 9 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याच्या विक्रमाशी बरोबरी करतील.विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांतील हा पहिलाच प्रसंग असेल, जेव्हा रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे.देशवासीयांचे लक्ष आता या अर्थसंकल्पात सरकार कोणत्या मोठ्या घोषणा करते, याकडे लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!