Homeमहाराष्ट्रसर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन चालण्याची नारायणगडाची परंपरा – महंत शिवाजी महाराज

सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन चालण्याची नारायणगडाची परंपरा – महंत शिवाजी महाराज

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : मराठवाड्यातील संतपरंपरेचा वारसा जपत सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन समाजहित साधण्याची श्रीक्षेत्र नारायणगडाची परंपरा आजही अखंडपणे सुरू असल्याचे प्रतिपादन महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांनी केले. गेवराई तालुक्यातील उमापूर येथे श्रीक्षेत्र नारायणगडाचा ७४ वा भव्य नारळी सप्ताह मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सप्ताहाच्या सांगता सोहळ्यासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावल्याने परिसरात भक्तीचा महासागर उसळला होता.

या सप्ताहात महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नंदाच्या घराला’ या अभंगावर आधारित भव्य काल्याचे हरीकीर्तन पार पडले. या वेळी विविध क्षेत्रातील संत-महंत, मान्यवर आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार निलेश लंके, आमदार विजयसिंह पंडित यांसह अनेक मान्यवरांनी सप्ताहाला भेट देऊन भक्ती सोहळ्याचा आनंद घेतला. तसेच गोरक्षनाथ संस्थानचे महंत दत्ता महाराज गिरी, बदामराव पंडित, नामदेव महाराज शेकटेकर, संभाजी महाराज, नारायण महाराज यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यावेळी बोलताना महंत शिवाजी महाराज म्हणाले की, संत नगदनारायण महाराजांच्या आशीर्वादात अपार शक्ती असून त्यांच्या सेवेमुळे भक्तांना आध्यात्मिक समाधान लाभते. गेल्या आठ दिवसांपासून ग्रामस्थांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे हा सप्ताह अभूतपूर्व ठरला आहे. “काला” ही परंपरा एकत्र येऊन साजरी करण्याचा संदेश देत असून समाजात एकता आणि समरसता निर्माण करण्याचे कार्य करते. प्रत्येकाने आयुष्यात नम्रता आणि साधेपणा जपावा तसेच साधुसंतांच्या मार्गदर्शनाखाली जीवन जगावे, असा संदेशही त्यांनी दिला.

तरुणांनी अशा भक्तीमय वातावरणात सहभागी होऊन अध्यात्माची ओढ निर्माण करावी, तसेच “रामकृष्ण हरी” या नामजपाचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. सप्ताहाच्या सांगता सोहळ्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी महिला व पुरुष भाविकांचा मोठा जनसागर उसळला होता.

या सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी उमापूर व मारोतीचीवाडी येथील ग्रामस्थांनी गेल्या सहा महिन्यांपासून परिश्रम घेतले होते. भाविकांसाठी भोजन, पाणी व इतर सोयींची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी सेवाभावाने सहभाग घेतल्याने सोहळा अधिक यशस्वी ठरला. याबद्दल महंत शिवाजी महाराज यांनी ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले.

दरम्यान, यंदाचा ७४ वा नारळी सप्ताह उमापूर येथे पार पडला असून, पुढील वर्षी २०२७ मध्ये श्रीक्षेत्र नारायणगड येथे ७५ वा अमृतमहोत्सवी नारळी सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा महंत शिवाजी महाराज यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर...

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...

आवळगाव व पिंपळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात; ५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व...

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) म्हणून निवड

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :   मुंबई शहर येथे दिनांक 20 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या 36 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा...

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर...

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...

आवळगाव व पिंपळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात; ५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व...

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) म्हणून निवड

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :   मुंबई शहर येथे दिनांक 20 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या 36 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा...
error: Content is protected !!