Homeमहाराष्ट्रसर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन चालण्याची नारायणगडाची परंपरा – महंत शिवाजी महाराज

सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन चालण्याची नारायणगडाची परंपरा – महंत शिवाजी महाराज

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : मराठवाड्यातील संतपरंपरेचा वारसा जपत सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन समाजहित साधण्याची श्रीक्षेत्र नारायणगडाची परंपरा आजही अखंडपणे सुरू असल्याचे प्रतिपादन महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांनी केले. गेवराई तालुक्यातील उमापूर येथे श्रीक्षेत्र नारायणगडाचा ७४ वा भव्य नारळी सप्ताह मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सप्ताहाच्या सांगता सोहळ्यासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावल्याने परिसरात भक्तीचा महासागर उसळला होता.

या सप्ताहात महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नंदाच्या घराला’ या अभंगावर आधारित भव्य काल्याचे हरीकीर्तन पार पडले. या वेळी विविध क्षेत्रातील संत-महंत, मान्यवर आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार निलेश लंके, आमदार विजयसिंह पंडित यांसह अनेक मान्यवरांनी सप्ताहाला भेट देऊन भक्ती सोहळ्याचा आनंद घेतला. तसेच गोरक्षनाथ संस्थानचे महंत दत्ता महाराज गिरी, बदामराव पंडित, नामदेव महाराज शेकटेकर, संभाजी महाराज, नारायण महाराज यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यावेळी बोलताना महंत शिवाजी महाराज म्हणाले की, संत नगदनारायण महाराजांच्या आशीर्वादात अपार शक्ती असून त्यांच्या सेवेमुळे भक्तांना आध्यात्मिक समाधान लाभते. गेल्या आठ दिवसांपासून ग्रामस्थांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे हा सप्ताह अभूतपूर्व ठरला आहे. “काला” ही परंपरा एकत्र येऊन साजरी करण्याचा संदेश देत असून समाजात एकता आणि समरसता निर्माण करण्याचे कार्य करते. प्रत्येकाने आयुष्यात नम्रता आणि साधेपणा जपावा तसेच साधुसंतांच्या मार्गदर्शनाखाली जीवन जगावे, असा संदेशही त्यांनी दिला.

तरुणांनी अशा भक्तीमय वातावरणात सहभागी होऊन अध्यात्माची ओढ निर्माण करावी, तसेच “रामकृष्ण हरी” या नामजपाचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. सप्ताहाच्या सांगता सोहळ्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी महिला व पुरुष भाविकांचा मोठा जनसागर उसळला होता.

या सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी उमापूर व मारोतीचीवाडी येथील ग्रामस्थांनी गेल्या सहा महिन्यांपासून परिश्रम घेतले होते. भाविकांसाठी भोजन, पाणी व इतर सोयींची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी सेवाभावाने सहभाग घेतल्याने सोहळा अधिक यशस्वी ठरला. याबद्दल महंत शिवाजी महाराज यांनी ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले.

दरम्यान, यंदाचा ७४ वा नारळी सप्ताह उमापूर येथे पार पडला असून, पुढील वर्षी २०२७ मध्ये श्रीक्षेत्र नारायणगड येथे ७५ वा अमृतमहोत्सवी नारळी सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा महंत शिवाजी महाराज यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात...

राज्यस्तरीय पुरस्काराने नवनाथ आव्हाड यांचा गौरव

0
सिन्नर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नवनाथ आव्हाड यांना माता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त प्रदान करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या "इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२६" या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल दोडी...

भटके विमुक्त समाज स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही पालातच….

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): भटके विमुक्त समाजाची घरगणना व जनगणना करण्यात यावी याकरिता ॲड. डॉ.अरूण जाधव भटक्या विमुक्त समाजाचे नेते यांच्या नेतृत्वाखाली निघालेली "मुशाफिरी...

गेवराईचे तहसीलदार हटवा, गोदावरी वाचवा; अवैध वाळू उपशावर नागरिकांचा संताप

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गोदाकाठच्या...

दौंड पोलिसांची धडक कारवाई; १९ बुलेट मोटारसायकलींचे मॉडिफाईड सायलेंसर जप्त

0
दौंड, (प्रतिनिधी-मयुर साळवे,संघराज गायकवाड): दौंड शहर व परिसरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेंसरयुक्त बुलेट व मोटारसायकलींवर दौंड पोलिसांनी विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली....

लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात...

राज्यस्तरीय पुरस्काराने नवनाथ आव्हाड यांचा गौरव

0
सिन्नर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नवनाथ आव्हाड यांना माता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त प्रदान करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या "इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२६" या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल दोडी...

भटके विमुक्त समाज स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही पालातच….

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): भटके विमुक्त समाजाची घरगणना व जनगणना करण्यात यावी याकरिता ॲड. डॉ.अरूण जाधव भटक्या विमुक्त समाजाचे नेते यांच्या नेतृत्वाखाली निघालेली "मुशाफिरी...

गेवराईचे तहसीलदार हटवा, गोदावरी वाचवा; अवैध वाळू उपशावर नागरिकांचा संताप

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गोदाकाठच्या...

दौंड पोलिसांची धडक कारवाई; १९ बुलेट मोटारसायकलींचे मॉडिफाईड सायलेंसर जप्त

0
दौंड, (प्रतिनिधी-मयुर साळवे,संघराज गायकवाड): दौंड शहर व परिसरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेंसरयुक्त बुलेट व मोटारसायकलींवर दौंड पोलिसांनी विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली....
error: Content is protected !!