Homeमहाराष्ट्रसर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन चालण्याची नारायणगडाची परंपरा – महंत शिवाजी महाराज

सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन चालण्याची नारायणगडाची परंपरा – महंत शिवाजी महाराज

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : मराठवाड्यातील संतपरंपरेचा वारसा जपत सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन समाजहित साधण्याची श्रीक्षेत्र नारायणगडाची परंपरा आजही अखंडपणे सुरू असल्याचे प्रतिपादन महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांनी केले. गेवराई तालुक्यातील उमापूर येथे श्रीक्षेत्र नारायणगडाचा ७४ वा भव्य नारळी सप्ताह मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सप्ताहाच्या सांगता सोहळ्यासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावल्याने परिसरात भक्तीचा महासागर उसळला होता.

या सप्ताहात महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नंदाच्या घराला’ या अभंगावर आधारित भव्य काल्याचे हरीकीर्तन पार पडले. या वेळी विविध क्षेत्रातील संत-महंत, मान्यवर आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार निलेश लंके, आमदार विजयसिंह पंडित यांसह अनेक मान्यवरांनी सप्ताहाला भेट देऊन भक्ती सोहळ्याचा आनंद घेतला. तसेच गोरक्षनाथ संस्थानचे महंत दत्ता महाराज गिरी, बदामराव पंडित, नामदेव महाराज शेकटेकर, संभाजी महाराज, नारायण महाराज यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यावेळी बोलताना महंत शिवाजी महाराज म्हणाले की, संत नगदनारायण महाराजांच्या आशीर्वादात अपार शक्ती असून त्यांच्या सेवेमुळे भक्तांना आध्यात्मिक समाधान लाभते. गेल्या आठ दिवसांपासून ग्रामस्थांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे हा सप्ताह अभूतपूर्व ठरला आहे. “काला” ही परंपरा एकत्र येऊन साजरी करण्याचा संदेश देत असून समाजात एकता आणि समरसता निर्माण करण्याचे कार्य करते. प्रत्येकाने आयुष्यात नम्रता आणि साधेपणा जपावा तसेच साधुसंतांच्या मार्गदर्शनाखाली जीवन जगावे, असा संदेशही त्यांनी दिला.

तरुणांनी अशा भक्तीमय वातावरणात सहभागी होऊन अध्यात्माची ओढ निर्माण करावी, तसेच “रामकृष्ण हरी” या नामजपाचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. सप्ताहाच्या सांगता सोहळ्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी महिला व पुरुष भाविकांचा मोठा जनसागर उसळला होता.

या सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी उमापूर व मारोतीचीवाडी येथील ग्रामस्थांनी गेल्या सहा महिन्यांपासून परिश्रम घेतले होते. भाविकांसाठी भोजन, पाणी व इतर सोयींची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी सेवाभावाने सहभाग घेतल्याने सोहळा अधिक यशस्वी ठरला. याबद्दल महंत शिवाजी महाराज यांनी ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले.

दरम्यान, यंदाचा ७४ वा नारळी सप्ताह उमापूर येथे पार पडला असून, पुढील वर्षी २०२७ मध्ये श्रीक्षेत्र नारायणगड येथे ७५ वा अमृतमहोत्सवी नारळी सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा महंत शिवाजी महाराज यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

विंचूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण अभिवादन

0
विंचूर (प्रतिनिधी उत्तम जाधव, योगेश कर्डिले) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विंचूर येथे...

लासलगाव व चांदवड आंदोलनानंतर नाफेडच्या कांदा खरेदी निकषांमध्ये बदल : आता बाजार समितीमध्येही खरेदीला...

0
लासलगाव निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : 4 जून 2026, लासलगाव व चांदवड येथे शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला...

निळवंडे कालव्याच्या वितरिकांची कामे तातडीने पूर्ण करा : खासदार राजाभाऊ वाजे

0
सिन्नर, प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) – सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी, मलढोण, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द आणि वारेगाव या गावांतील शेतकऱ्यांना निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी...

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार विनोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम

0
जळगाव, दि. ३ जून (प्रतिनिधी) – टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या,...

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

विंचूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण अभिवादन

0
विंचूर (प्रतिनिधी उत्तम जाधव, योगेश कर्डिले) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विंचूर येथे...

लासलगाव व चांदवड आंदोलनानंतर नाफेडच्या कांदा खरेदी निकषांमध्ये बदल : आता बाजार समितीमध्येही खरेदीला...

0
लासलगाव निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : 4 जून 2026, लासलगाव व चांदवड येथे शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला...

निळवंडे कालव्याच्या वितरिकांची कामे तातडीने पूर्ण करा : खासदार राजाभाऊ वाजे

0
सिन्नर, प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) – सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी, मलढोण, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द आणि वारेगाव या गावांतील शेतकऱ्यांना निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी...

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार विनोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम

0
जळगाव, दि. ३ जून (प्रतिनिधी) – टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या,...
error: Content is protected !!