Homeआरोग्यडॉ. दीपक फाटक यांच्या कर्तृत्वाने रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप.

डॉ. दीपक फाटक यांच्या कर्तृत्वाने रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप.

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील अंबू नाईक तांड्या (खांडवी) येथील आदिवासी पारधी समाजातील रहिवासी श्री. भद्री भोसले (वय ४०) यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता गेवराई क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पत्नीने बेशुद्ध अवस्थेत दाखल केले. त्यावेळी रुग्णाचे तापमान १०५.६°F दर्शविणार्‍या उच्च श्रेणीतील तापासह त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक अवस्थेत होती. रुग्णाच्या मेंदूला ताप गेल्यामुळे त्यांची शुद्धी पूर्णतः विस्कळीत झाली होती व त्यांना स्टेटस एपिलेप्टिकस (सातत्याने येणाऱ्या फिट्स/सीझर) चा त्रास होत होता. या गंभीर अवस्थेमुळे भद्री भोसले यांचे घरचे व नातेवाईक पूर्णपणे घाबरले होते. त्यावेळी डॉ. दिपक फाटक यांनी नातेवाईकांना प्रकृती व उपचारपद्धत समजावून सांगितले व सर्वांना धीर दिला.

यानंतर डॉ. दिपक फाटक यांनी रुग्णावर तात्काळ उपचार सुरू केले व NCCT ब्रेन (CT Scan) करून मेंदूची तपासणी केली. अशिक्षित असलेल्या नातेवाईकांना तपासणीचा अर्थ समजणे कठीण असल्यामुळे, डॉक्टरांनीच योग्य निर्णय घेत उपचारपद्धत सुरू ठेवली. रुग्णला सतत उच्च ताप राहिला व तो सुमारे ३ दिवस पूर्णपणे कोमामध्ये राहिला. भद्री भोसले यांची आर्थिक परिस्थिती गरीब असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. फाटक यांनी महागड्या चाचण्यांवर सवलत देऊन आवश्यक त्या तपासण्या करून घेतल्या.

पुढे रुग्णाच्या मानेच्या कडकपणाची (stiff neck) लक्षणे दिसल्यानंतर डॉ. फाटक यांनी मेंदू व पाठीच्या कण्यातील सेरेब्रोस्पायनल फ्लूइड (CSF) ची तपासणी करून त्यात मेनिंजायटिसची लक्षणे आढळली. त्यानंतर योग्य अँटिबायोटिक व योग्य औषधोपचारांचा अभियान सुरू ठेवला. त्याच्या परिणामस्वरूप तीन दिवसांनी भद्री भोसले यांना शुद्धी येऊ लागली. भद्री भोसले यांना दारू पिण्याची सवय असल्यामुळे पुन्हा विड्रॉल च्या अवस्थेत त्यांना पुन्हा फिट्स येऊ लागल्या. त्यावर डॉ. फाटक यांनी योग्य उपचार चालू ठेवल्याने दोन दिवसांतच रुग्ण विड्रॉलच्या अवस्थेतून बाहेर आला. अखेरीस भद्री भोसले पूर्णपणे बरे झाले, ते बोलू लागले, चालू लागले आणि फिरू लागले. त्यांच्या पत्नी, मुलां व नातेवाईकांना यामुळे मोठा आनंद झाला.

पैशाची अपेक्षा न ठेवता सामाजिक जबाबदारी व माणुसकी दाखवत डॉ. दिपक फाटक यांनी भद्री भोसले यांना जीवदान दिले. त्यांना ३० एप्रिल २०२६ रोजी डॉ. फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली डिस्चार्ज देण्यात आले. त्यावेळी आदिवासी सेवक पुरस्काराने सन्मानित असलेले सामाजिक कार्यकर्ते कडूदास कांबळे यांनी व रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉ. फाटक यांचा आदरपूर्वक सन्मान करून त्यांचे आभार मानले.

डॉ. फाटक यांनी रुग्णाला फक्त उपचारच नव्हे तर आगामी दिशाही दिली. त्यांनी भद्री भोसले यांना आगामी जीवनात दारू सोडून आरोग्याचे जतन करण्याचे सक्षम मार्गदर्शन केले. सहा दिवसांत गंभीर अवस्थेतील रुग्णाला पूर्णपणे बरा करण्याच्या डॉ. दिपक फाटक यांच्या कर्तृत्वामुळे गेवराई शहरातील नागरिकांनी त्यांच्याबद्दल “गोरगरीबांचा खरा कैवारी, गरीबांचा आधार” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंद्रपूरला नवे नेतृत्व: आयुष नोेपानी यांची जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

0
चंद्रपूर ( निलेश ठाकरे - महाराष्ट्र हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र) :  जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून आयुष नोेपानी यांची जिल्हा...

जिल्ह्यात आजपासून जनगणना सुरू; चुकीची माहिती दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  जळगाव जिल्ह्यात आजपासून जनगणना प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, या महत्त्वाच्या उपक्रमासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाभरात सुमारे ७...

गढी ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात; ध्वजारोहणासह मान्यवरांची उपस्थिती

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील गढी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी सरपंच तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ....

सुशीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात; सामाजिक ऐक्याचा संदेश

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील सुशी गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात...

नवेगाव खुर्द येथील मामा तलावाची फुटलेली पाळ तातडीने दुरुस्त करा; प्रमोद चिमुरकर

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :  ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा नवेगाव खुर्द येथील मामा तलावाची पाळ मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे फुटली होती. ही पाळ आगामी पावसाळ्यापूर्वी...

चंद्रपूरला नवे नेतृत्व: आयुष नोेपानी यांची जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

0
चंद्रपूर ( निलेश ठाकरे - महाराष्ट्र हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र) :  जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून आयुष नोेपानी यांची जिल्हा...

जिल्ह्यात आजपासून जनगणना सुरू; चुकीची माहिती दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  जळगाव जिल्ह्यात आजपासून जनगणना प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, या महत्त्वाच्या उपक्रमासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाभरात सुमारे ७...

गढी ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात; ध्वजारोहणासह मान्यवरांची उपस्थिती

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील गढी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी सरपंच तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ....

सुशीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात; सामाजिक ऐक्याचा संदेश

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील सुशी गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात...

नवेगाव खुर्द येथील मामा तलावाची फुटलेली पाळ तातडीने दुरुस्त करा; प्रमोद चिमुरकर

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :  ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा नवेगाव खुर्द येथील मामा तलावाची पाळ मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे फुटली होती. ही पाळ आगामी पावसाळ्यापूर्वी...
error: Content is protected !!