Homeताज्या बातम्यासमुदाय आरोग्य अधिकारी यांच्या 1974 पदांची भरती प्रक्रिया ७ महिन्यां पासून रखडली...

समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या 1974 पदांची भरती प्रक्रिया ७ महिन्यां पासून रखडली !

गेवराई तालुका प्रतिनिधी विष्णू गायकवाड: राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी पदाच्या 1974 जागांसाठी निघालेल्या भरती प्रक्रियेला सध्या पूर्णपणे स्थगित आली आहे.
या पदासाठी राज्यभरातील अंदाजे 23 ते 25 हजार‌ BSC Nursing, BAMS व BUMS पदवीधर उमेदवारांनी अर्ज केले होते.
या पदासाठी BHMS+CCMP पदवीधरांनाही पात्र करावे यासाठी काही BHMS पदवीधर उमेदवारांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली ( नंबर 7967/2025 व W.P.No. 7594/2025 ) प्रकरणाच्य सुनावणीमध्ये मा.न्यायालयाने या भरती प्रक्रियेला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देत केंद्र व राज्य सरकारला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे समुदाय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेला ब्रेक लागला आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2 डिसेंबर 2025 रोजी टेक्निकल कमिटी/टास्क फोर्स गठीत केली. या समितीत आयुष मंत्रालय, नॅशनल मेडिकल कमिशन, इंडियन नर्सिंग कौन्सिल चे प्रतिनिधी आहेत.ही समिती BHMS + CCMP उत्तीर्ण उमेदवारांना या पदासाठी पात्र करता येईल की कसे याचा अभ्यास करून अहवाल सादर करणार होती पण 6 महिने उलटूनही याबाबत अंतिम निर्णय झालेला दिसत नाही.
समुदाय आरोग्य अधिकारी यांची 1974 पदे रिक्त असल्याने त्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवा कोलमडू शकते.कारण समुदाय आरोग्य अधिकारी हे आजच्या प्राथमिक आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत.
तसेच समुदाय आरोग्य अधिकारी यांची सन‌ 2024-2025 मधील बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. परंतु गडचीरोली,पालघर,सिंधुदुर्ग या सारख्या आदिवासी व दुर्गम जिल्ह्यांमधील समुदाय आरोग्य अधिकारी यांना बदली मिळून 1 वर्ष होत आहे तरी त्यांना कार्यमुक्त केल्या जात नाही.याबाबत विचारणा केली असता असे सांगण्यात येत आहे की नवीन पद भरती झाल्यानंतरच त्यांना कार्यमुक्त करण्यात येईल.
“राज्य सरकारने केंद्र सरकार कडे योग्य तो पाठपुरावा करत न्यायालयाला पण विनंती करून समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या पदभरती च्या स्थगितीवरील याचीका फास्टट्रॅक वर घेऊन लवकर निकाल लावावा अशी विनंती करावी तसेच दुर्गम भागातील बदली झालेल्या समुदाय आरोग्य अधिकारी यांना तात्काळ कार्यमुक्त करावे ही नम्र विनंती”
श्री दत्ता शांतिनाथ मुळे
राज्य अध्यक्ष अखिल भारतीय समुदाय आरोग्य अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पीएम किसान योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ३० जून २०२६ पूर्वी ई-केवायसी अनिवार्य

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सिन्नर तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने सन २०२५-२६ करिता वार्षिक ई-केवायसी प्रमाणिकरण...

गोदावरी नदीपात्रात मृत्यूची मालिका सुरूच वाळू माफियांनी केलेल्या खड्ड्यांमध्ये अडकून युवकाचा दुर्दैवी अंत

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे): शहरातील धनगर गल्ली येथील राधाजी बळीराम शिंदे वय १९ वर्ष हा घरच्या नातेवाईकासोबत गोदावरी नदीपात्रामध्ये अंघोळीसाठी गेला असता नदीपात्राममधील खड्ड्याचा...

पुणे रेल्वे पोलीस अधीक्षकांच्या बदली धोरणावर प्रश्नचिन्ह; दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांबाबतही चर्चा

0
पुणे (मुज्जम्मील शेख): पुणे रेल्वे पोलीस दलात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्या बदली प्रक्रियेबाबत सध्या पोलीस वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली...

श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न पुरुषोत्तम मासनिमित्त हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान, कुंभेजळगाव (ता.गेवराई) येथे पुरुषोत्तम मास निमित्त महंत दत्तात्रय महाराज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहासह विविध...

वा स्पोर्ट्स क्लब फेडरेशन अंबरनाथतर्फे प्रथमच “लेवा चषक 2026” बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा उत्साहात...

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): लेवा समाजामध्ये क्रीडाभावना रुजविणे, सर्व वयोगटातील समाजबांधवांना एकत्र आणणे आणि समाजातील एकोपा अधिक दृढ करणे या उद्देशाने लेवा स्पोर्ट्स क्लब...

पीएम किसान योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ३० जून २०२६ पूर्वी ई-केवायसी अनिवार्य

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सिन्नर तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने सन २०२५-२६ करिता वार्षिक ई-केवायसी प्रमाणिकरण...

गोदावरी नदीपात्रात मृत्यूची मालिका सुरूच वाळू माफियांनी केलेल्या खड्ड्यांमध्ये अडकून युवकाचा दुर्दैवी अंत

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे): शहरातील धनगर गल्ली येथील राधाजी बळीराम शिंदे वय १९ वर्ष हा घरच्या नातेवाईकासोबत गोदावरी नदीपात्रामध्ये अंघोळीसाठी गेला असता नदीपात्राममधील खड्ड्याचा...

पुणे रेल्वे पोलीस अधीक्षकांच्या बदली धोरणावर प्रश्नचिन्ह; दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांबाबतही चर्चा

0
पुणे (मुज्जम्मील शेख): पुणे रेल्वे पोलीस दलात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्या बदली प्रक्रियेबाबत सध्या पोलीस वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली...

श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न पुरुषोत्तम मासनिमित्त हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान, कुंभेजळगाव (ता.गेवराई) येथे पुरुषोत्तम मास निमित्त महंत दत्तात्रय महाराज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहासह विविध...

वा स्पोर्ट्स क्लब फेडरेशन अंबरनाथतर्फे प्रथमच “लेवा चषक 2026” बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा उत्साहात...

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): लेवा समाजामध्ये क्रीडाभावना रुजविणे, सर्व वयोगटातील समाजबांधवांना एकत्र आणणे आणि समाजातील एकोपा अधिक दृढ करणे या उद्देशाने लेवा स्पोर्ट्स क्लब...
error: Content is protected !!