Homeताज्या बातम्यादुष्काळावर मात करण्यासाठी पारंपरिक जलस्रोत संवर्धन गरजेचे. लांबलेल्या पावसामुळे पाणीटंचाईची भीती

दुष्काळावर मात करण्यासाठी पारंपरिक जलस्रोत संवर्धन गरजेचे. लांबलेल्या पावसामुळे पाणीटंचाईची भीती

गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): यंदा पावसाचे आगमन लांबल्याने अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. वाढत्या उन्हामुळे विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांवर ताण वाढत असून भूजल पातळीही कमी होत चालली आहे. अशा परिस्थितीत भविष्यातील पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी गावातील सार्वजनिक जुन्या विहिरी आणि तलावांचे जतन व संवर्धन करणे गरजेचे झाले आहे. कधीकाळी गावाच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य आधार असलेल्या या जुन्या विहिरी आणि तलावांकडे आज दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. अनेक विहिरींमध्ये गाळ साचला आहे, काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे तर काही विहिरी पूर्णपणे बुजवून टाकण्यात आल्या आहेत. अनेक जुने तलावही देखभालीअभावी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एकेकाळी गावाची तहान भागवणारे आणि शेतीला आधार देणारे हे जलस्रोत आज उपेक्षित झाले आहेत. गावातील जुने तलाव हे केवळ पाणी साठवण्याचे ठिकाण नसून पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल वाढवण्याचे महत्त्वाचे साधन आहेत. विहिरी आणि तलावांचे पुनरुज्जीवन केल्यास भूजल पातळी वाढण्यास मदत होऊ शकते आणि उन्हाळ्यातही पाण्याची उपलब्धता टिकून राहू शकते. यंदा पाऊस लांबल्याने विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांवरील भिस्त वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जुन्या जलस्रोतांचे महत्त्व पुन्हा एकदा जाणवू लागले आहे. दिवसेंदिवस सरासरी पावसातील घट, वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे वेगाने होणारे बाष्पीभवन आणि बदलते हवामान याचा विचार करता प्रत्येक गावातील दुर्लक्षित जुन्या सार्वजनिक विहिरी आणि तलावांची स्वच्छता, गाळ काढणे, पावसाचे पाणी अडवणे आणि अतिक्रमण हटविण्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. भविष्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीच तर आज दुर्लक्षित असलेल्या याच जुन्या विहिरी आणि तलाव गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी महत्त्वाचा आधार ठरू शकतात. त्यामुळे या पारंपारिक जलस्रोतांचे जतन करणे ही केवळ पर्यावरणाची गरज नसून गावाच्या भविष्यातील जलसुरक्षेची जबाबदारी आहे. ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन विहिरी व तलाव वाचवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आज जपलेली प्रत्येक विहीर आणि प्रत्येक तलाव उद्याच्या पिढीसाठी पाण्याचा भक्कम आधार ठरू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ अवघड)  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी सिन्नर येथील छत्रपती शिवाजी...

१४ मोकाट जनावरे ताब्यात, हळदा गोशाळेत रवानगी

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मपुरी नगर परिषदेने...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ अवघड)  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी सिन्नर येथील छत्रपती शिवाजी...

१४ मोकाट जनावरे ताब्यात, हळदा गोशाळेत रवानगी

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मपुरी नगर परिषदेने...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....
error: Content is protected !!