ब्रह्मपुरी प्रतिनिधी: प्रगती आणि विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या ब्रम्हपुरी परिसरातील एका इथेनॉल प्रकल्पाविरोधात ‘ टाईम्स ऑफ महाराष्ट्र’ या दैनिक वृत्तपत्राने वृत्त प्रसिद्ध केले होते. या बातमीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तात्काळ सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत
ब्रम्हपुरी परिसराजवळ उभारण्यात आलेल्या इथेनॉल प्रकल्पामधून रासायनिक आणि दूषित पाणी बाहेर सोडले जात आहे. हे दूषित पाणी स्थानिक जलस्रोतांमध्ये मिसळल्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे पाणी प्यायल्यामुळे आणि वापरल्यामुळे गावकऱ्यांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.
त्वचा रोग: त्वचेला गंभीर संसर्ग होणे.अंगाला खाज सुटणे: सतत खाज सुटून त्वचा लाल पडणे.पुरळ उठणे: अंगावर मोठ्या प्रमाणात पुरळ येणे.
उदापूर ,बोरगाव, झीलबोडी पारडगाव, परसोडी, पेटवार्ड आणि फुलेनगर
टाईम्स ऑफ महाराष्ट्र’मध्ये दिनांक १० जुलै २०२६ रोजी ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर उप-प्रादेशिक कार्यालयाचे अधिकारी सुशीलकुमार सहेत्रस राठोड यांनी १६ जुलै २०२६ रोजी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अधिकृत पत्र पाठवले आहे .
या पत्राद्वारे त्यांनी आदेश दिले आहेत की:दूषित पाण्यामुळे बाधित झालेल्या सर्व ७ गावांमध्ये आरोग्य पथकाद्वारे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे.गावातील आजारी लोकांची स्थिती आणि पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करून त्याचा सविस्तर अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाला लवकरात लवकर सादर करावा.
वृत्तपत्राच्या बातमीमुळे प्रशासनाने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे स्थानिक गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रदूषण करणाऱ्या संबंधित इथेनॉल प्रकल्पावर आता काय कडक कारवाई होणार, याकडे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
























