Homeताज्या बातम्याAmit Shah, Mamata Banerjee : “अमित शहा vs ममता: बंगाल निवडणुकीत घुसखोरी...

Amit Shah, Mamata Banerjee : “अमित शहा vs ममता: बंगाल निवडणुकीत घुसखोरी व पहलगाम हल्ल्यावर वाद”

Times of Maharashtra Desk: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी ३० डिसेंबर २०२५ पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारवर निवडणुकीच्या फायद्यासाठी बांगलादेशी घुसखोरीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला. बांकुरा येथे एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले.या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची तुलना महाभारतातील दुर्योधन आणि दुशासन यांच्याशी केली. त्यांनी सांगितले, “शकुनीचा शिष्य दुशासन माहिती गोळा करण्यासाठी बंगालमध्ये आला आहे. निवडणुका जवळ आल्यावर दुशासन आणि दुर्योधन दिसतात.”

त्याचप्रमाणे, ममता बॅनर्जी यांनी पहलगाम हल्ला आणि दिल्लीतील दहशतवादी घटनांबाबतही केंद्रावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, “जर जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी नसतील, तर पहलगामची घटना कशी घडली? पहलगाममध्ये हल्ला तुम्हीच घडवून आणला का?”केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २०२६ मधील बंगाल निवडणुकीत घुसखोरीच्या मुद्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले. त्यांनी तृणमूल काँग्रेसवर आरोप केला की त्यांनी बांगलादेशच्या सीमेवर कुंपण बांधण्यासाठी जमीन दिली नाही. त्यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या, “राज्याने जमीन दिल्याने सर्व रेल्वे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. आज भाजप म्हणत आहे की मी जमीन दिली नाही, तर पेट्रापोल आणि अंदलमध्ये जमीन कोणी दिली?”

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एसआयआरवरही टीका केली. त्या म्हणाल्या, “एसआयआर हा एआयच्या मदतीने होणारा घोटाळा आहे. मतदार यादीतून जर एकाही वैध मतदाराचे नाव वगळले गेले, तर तृणमूल काँग्रेस दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाची घेराबंदी करेल. एसआयआरमुळे सुमारे ६० लोकांचा मृत्यू झाला आहे. वृद्धांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवणे हा राज्यातील जनता सहन करणार नाही.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करून निवेदन देण्यात आले

0
बुलढाणा प्रतिनिधी अनिल वायाळ :  पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवून व पुरेसा साठा उपलब्ध करुन द्या अन्यथा तीव्र आंदोलन...

लासलगावमध्ये शेतीच्या बांधावरून वाद महिलेला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा

0
निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : शेतीच्या सामायिक बांधावरील लोखंडी अँगल वाकवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 30 वर्षीय महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची...

दौंडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई मोठ्या पुरवठादारांवर कारवाईची मागणी जोरात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) : दौंड शहर आणि तालुक्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली...

गेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
बीड (प्रतिनिधी विशेष) : बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार...

चंद्रपूर मनपाच्या २०१४ GIS सर्व्हेवर पुन्हा संशय “साठगाठ घोटाळा”च्या आरोपांनी खळबळ

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर महानगरपालिकेने २०१४ मध्ये राबविलेल्या GIS आधारित मालमत्ता सर्व्हे प्रकल्पावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहर विकास,...

लोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करून निवेदन देण्यात आले

0
बुलढाणा प्रतिनिधी अनिल वायाळ :  पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवून व पुरेसा साठा उपलब्ध करुन द्या अन्यथा तीव्र आंदोलन...

लासलगावमध्ये शेतीच्या बांधावरून वाद महिलेला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा

0
निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : शेतीच्या सामायिक बांधावरील लोखंडी अँगल वाकवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 30 वर्षीय महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची...

दौंडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई मोठ्या पुरवठादारांवर कारवाईची मागणी जोरात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) : दौंड शहर आणि तालुक्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली...

गेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
बीड (प्रतिनिधी विशेष) : बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार...

चंद्रपूर मनपाच्या २०१४ GIS सर्व्हेवर पुन्हा संशय “साठगाठ घोटाळा”च्या आरोपांनी खळबळ

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर महानगरपालिकेने २०१४ मध्ये राबविलेल्या GIS आधारित मालमत्ता सर्व्हे प्रकल्पावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहर विकास,...
error: Content is protected !!