Homeताज्या बातम्याराज्यात २ वेगळे कायदे आहेत का? प्रचारात सुलतान दंग ; सरकारवर कडाडले...

राज्यात २ वेगळे कायदे आहेत का? प्रचारात सुलतान दंग ; सरकारवर कडाडले संजय राऊत…

राज्यात २ वेगळे कायदे आहेत का? प्रचारात सुलतान दंग ; सरकारवर कडाडले संजय राऊत…

 

मुंबई : आमच्या दत्ता दळवींची काहींनी गाडी फोडली, ठीकय..दळवी बाहेर येतील आणि आमचे शिवसैनिक जागेवरच आहेत. ज्यांनी गाडी फोडली त्यांनी जर खरा मर्द असता तर तिथेच थांबायला पाहिजे होते.

पळून काय जाताय? तुम्ही तुमच्या नेत्यांच्या सांगण्यावरून आलेला आहात मग तुमचा नेता नामर्द आहे का? अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर घणाघात केला आहे.

भांडुप येथे दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्र्यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले म्हणून त्यांना अटक केली. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी दत्ता दळवी यांचे वाहन फोडले. त्यावर संजय राऊत म्हणाले की, आम्ही गाडी फोडली, पळून का जाता आम्ही तिथे आलोच असतो. शिवसैनिक पोहचलेच असते. या नामर्दानगी म्हणतात. राज्यात नामर्दाचे सरकार आहे.सुप्रिया सुळेंवर अपशब्द वापरले त्या अब्दुल सत्तारवर काय कारवाई केली? प्रकाश सुर्वेने तंगड्या तोडण्याची भाषा केली काय कारवाई केली? त्यांच्या मुलाने पिस्तुल दाखवत एका बिल्डरचे अपहरण केले तु्म्ही काय कारवाई केली? भाजपा, मिंदे गटाच्या आमदारांवर काय कारवाई केली याचे उत्तर तुम्ही आधी द्या. मग दत्ता दळवी यांच्या कारवाईवर बोला असं त्यांनी सांगितले.

तसेच या राज्यात २ कायदे आहेत का? गद्दारांसाठी वेगळा आणि जनतेसाठी वेगळा..गद्दार आणि बेईमान लोकांना वेगळा कायदा आणि इतरांसाठी वेगळा कायदा लावला असेल तर तसे जाहीर करावे. राज्यपाल हे घटनात्मक पदावर आहेत. त्यांनी सांगावे. राज्यात २ कायदे आहेत का? जो शब्द दत्ता दळवींनी वापरला तो चित्रपटात वापरला जातो, तो कापला जात नाही. आनंद दिघेंवर दंतकथात्मक चित्रपट बनवला त्यात दिघेंच्या तोंडी तो शब्द आहे. दिघेंनी वापरलेला शब्द त्यांच्या शिवसैनिकांनी वापरला तर तुम्ही त्याला तुरुंगात टाकता. हा तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांचा अपमान नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

दरम्यान, दत्ता दळवी प्रकरणी पोलिसांवर दबाव आहे. मी असो वा अन्य कुठलाही शिवसैनिक तुरुंगात गेल्यानं घाबरणार नाही. आम्ही डरपोक आणि नामर्द नाही. राज्यात शेतकरी हवालदिल आहेत. अवकाळी पावसामुळे गंभीर स्थिती झालीय. शेतकरी बांधावर आहे, मनात आत्महत्येचे विचार येतायेत. उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झालंय. सरकार कुठे आहे? सरकार पसार झालं आहे. अस्मानी संकट कोसळत असताना राज्याचे मुख्य सुलतान आणि २ डेप्युटी सुलतान हे प्रचारात गेलेत. सुलतान तेलंगणा, जयपूर असं निवडणूक पर्यटन सुरू आहे असा आरोपही संजय राऊतांनी राज्य सरकारवर केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

दौंडमध्ये जय मल्हार आषाढी पायी दिंडीचे भक्तिमय स्वागत; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांचा वारकरी...

0
दौंड: (प्रतिनिधी संघराज गायकवाड) जय मल्हार आषाढी पायी दिंडी, ढोकसांगवी (ता. शिरूर, जि. पुणे) पालखीचे श्री दत्त पीठ, दत्त मंदिर येथे अत्यंत भक्तिमय व...

भारतीय विद्यार्थ्यांची जागतिक पातळीवर सुवर्णमय झेप!

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) ५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (IPhO) २०२६ मध्ये भारतीय संघाने सर्व पाच सुवर्णपदके पटकावत देशाचा गौरव उंचावला आहे. कोलंबियातील बुकारामांगा येथे...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

दौंडमध्ये जय मल्हार आषाढी पायी दिंडीचे भक्तिमय स्वागत; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांचा वारकरी...

0
दौंड: (प्रतिनिधी संघराज गायकवाड) जय मल्हार आषाढी पायी दिंडी, ढोकसांगवी (ता. शिरूर, जि. पुणे) पालखीचे श्री दत्त पीठ, दत्त मंदिर येथे अत्यंत भक्तिमय व...

भारतीय विद्यार्थ्यांची जागतिक पातळीवर सुवर्णमय झेप!

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) ५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (IPhO) २०२६ मध्ये भारतीय संघाने सर्व पाच सुवर्णपदके पटकावत देशाचा गौरव उंचावला आहे. कोलंबियातील बुकारामांगा येथे...
error: Content is protected !!