Homeताज्या बातम्यावन विभागात खळबळ! १०९ कोटींच्या वृक्षलागवड घोटाळ्याची CBI चौकशी; उच्च न्यायालयाचे आदेश

वन विभागात खळबळ! १०९ कोटींच्या वृक्षलागवड घोटाळ्याची CBI चौकशी; उच्च न्यायालयाचे आदेश

पुणे (संपादक मुज्जम्मील शेख):- सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागात वृक्षलागवडीच्या नावाखाली तब्बल १०९ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) मार्फत चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिले आहेत. या आदेशानंतर राज्याच्या वन विभागात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणाची माहिती याचिकाकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी २ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्या मते, या प्रकरणात निष्पक्ष तपास व्हावा यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

काय आहे प्रकरण?

२०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, सोलापूर आणि पंढरपूर परिसरातील सामाजिक वनीकरण विभागातील काही अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात वृक्षलागवड न करताच शासनाच्या निधीतील सुमारे १०९ कोटी रुपयांचा कथित अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी दादासाहेब चव्हाण यांनी प्रथम पंढरपूर न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्देशानंतर ४ ऑगस्ट २०२२ रोजी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात सामाजिक वनीकरण विभागातील आठ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) वर्ग करण्यात आला.

पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात अपेक्षित कारवाई केली नाही. उलट संबंधित अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे निष्पक्ष आणि स्वतंत्र तपास व्हावा, या मागणीसाठी चार महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली.

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

या याचिकेवर २४ जून रोजी अंतिम सुनावणी झाली. न्यायमूर्ती संदेश पाटील आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने पोलिसांच्या तपासातील त्रुटी आणि संशयास्पद भूमिकेची नोंद घेत, संपूर्ण प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवण्याचे आदेश दिले.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना दादासाहेब चव्हाण यांनी या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सेवेतून निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

दरम्यान, CBI चौकशीचे आदेश मिळाल्यानंतर वन विभागातील अनेक अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, या तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इराणमध्ये खामेनेई यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंची गर्दी; संभाव्य दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हजारो कबरींची तयारी

0
तेहरान | वृत्तसंस्था इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यदर्शन आणि अंत्ययात्रेसाठी देशभरातून लाखो नागरिक तेहरानमध्ये दाखल होत असल्याने प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा आणि आपत्कालीन...

चापानेर जिल्हा परिषद प्रशालेस तीन विषय शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची पालकांची मागणी

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी संतोष खाजेकर) : तालुक्यातील चापानेर येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये मराठी, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांसाठी तीन विषय शिक्षकांची तातडीने नियुक्ती करावी, अशी...

मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या निवासस्थानी एसीबीचा मोठा छापा; तब्बल २.२४ कोटींची रोकड व मौल्यवान ऐवज जप्त

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): जळगाव अकोल्यातील लाचलुचपत प्रकरणाच्या तपासातून उघड झालेल्या धक्कादायक घडामोडींमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जळगाव येथे मोठी कारवाई करत मुद्रांक विभागाचे...

आरटीओचा काळा खेळ! ‘लहान मासे’ जाळ्यात… पण ‘मोठ्या मगरमच्छांना’ अभय कुणाचे?

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नॅशनल न्यूज विदर्भातील आरटीओ विभागात कारवाईचा धडाका; पण 'बड्या' अधिकाऱ्यांपर्यंत चौकशी कधी? भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालणार की फक्त औपचारिकता? नागपूर:विदर्भातील...

“बंदीचा फक्त कागद… कारवाई कुठे? महामाया कोल वॉशरीवर प्रशासनाची ‘मूक कृपा’ की संगनमत?”

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज (MPCB चा बंदी आदेश, वीज विभागाची नोटीस, तरीही सुरू कोळशाची वाहतूक; पाणी, वीज आणि प्रशासनाच्या भूमिकेवर...

इराणमध्ये खामेनेई यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंची गर्दी; संभाव्य दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हजारो कबरींची तयारी

0
तेहरान | वृत्तसंस्था इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यदर्शन आणि अंत्ययात्रेसाठी देशभरातून लाखो नागरिक तेहरानमध्ये दाखल होत असल्याने प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा आणि आपत्कालीन...

चापानेर जिल्हा परिषद प्रशालेस तीन विषय शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची पालकांची मागणी

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी संतोष खाजेकर) : तालुक्यातील चापानेर येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये मराठी, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांसाठी तीन विषय शिक्षकांची तातडीने नियुक्ती करावी, अशी...

मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या निवासस्थानी एसीबीचा मोठा छापा; तब्बल २.२४ कोटींची रोकड व मौल्यवान ऐवज जप्त

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): जळगाव अकोल्यातील लाचलुचपत प्रकरणाच्या तपासातून उघड झालेल्या धक्कादायक घडामोडींमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जळगाव येथे मोठी कारवाई करत मुद्रांक विभागाचे...

आरटीओचा काळा खेळ! ‘लहान मासे’ जाळ्यात… पण ‘मोठ्या मगरमच्छांना’ अभय कुणाचे?

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नॅशनल न्यूज विदर्भातील आरटीओ विभागात कारवाईचा धडाका; पण 'बड्या' अधिकाऱ्यांपर्यंत चौकशी कधी? भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालणार की फक्त औपचारिकता? नागपूर:विदर्भातील...

“बंदीचा फक्त कागद… कारवाई कुठे? महामाया कोल वॉशरीवर प्रशासनाची ‘मूक कृपा’ की संगनमत?”

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज (MPCB चा बंदी आदेश, वीज विभागाची नोटीस, तरीही सुरू कोळशाची वाहतूक; पाणी, वीज आणि प्रशासनाच्या भूमिकेवर...
error: Content is protected !!