उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर येथील सभेत बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी त्या पैशांचे काय केले, असा प्रश्न जाहीर सभेत उपस्थित केला होता. त्या पार्श्वभूमीवर बोलताना मोहोळ म्हणाले की , केंद्र सरकार कधीही पक्ष पाहून पैसे देत नाही.
मदत करताना किंवा कर्ज उपलब्ध करून देताना सहकार मोठा झाला पाहिजे, असाच दृष्टिकोन असतो. ते आमच्याबरोबर होते म्हणून पैसे दिले असे नाही आणि ते आता दुसरीकडे गेले म्हणून चौकशी होईल असेही नाही. मात्र मिळालेल्या मदतीचा योग्य विनियोग करण्याची जबाबदारी त्यांची आहे, तसे झाले नसेल तर मात्र चौकशी करावी लागेल.






















