Homeदेश-विदेशआखाती युद्धाचा परिणाम : देशात LPG टंचाई, केंद्राने ‘अत्यावश्यक वस्तू कायदा’ लागू...

आखाती युद्धाचा परिणाम : देशात LPG टंचाई, केंद्राने ‘अत्यावश्यक वस्तू कायदा’ लागू केला

 Times Of Maharashtra Desk : पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारतासह जगभरात दिसू लागला आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून भारतात घरगुती LPG सिलेंडर,व्यावसायिक LPG आणि CNG चा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

देशभरात अत्यावश्यक वस्तू कायदा (ECA) लागू

एरवी गॅस बुकिंगनंतर काही दिवसांत सिलेंडर मिळत असला तरी सध्या अनेक भागांत ग्राहकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात अत्यावश्यक वस्तू कायदा (ECA) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कायदा 5 मार्च 2026 पासून लागू करण्यात आला असून पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने सर्व तेलशुद्धीकरण कंपन्यांना प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर प्राधान्याने एलपीजी उत्पादनासाठी करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यामुळे भारताकडे येणारी अनेक इंधन टँकर्स समुद्रात अडकले आहेत. भारताच्या एलपीजी आयातीपैकी सुमारे ८५  ते९० टक्के पुरवठा याच मार्गाने येतो. त्यामुळे देशात इंधन टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भारतामध्ये दरवर्षी सुमारे ३१.३  दशलक्ष टन एलपीजीचा वापर होतो, मात्र त्यापैकी फक्त १२.८ दशलक्ष टन उत्पादन देशांतर्गत होते. उर्वरित एलपीजी आयातीवर अवलंबून आहे. सध्या भारताकडे केवळ २५ ते३०दिवस पुरेल इतकाच एलपीजी साठा शिल्लक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.ECA कायदा लागू झाल्यानंतर केंद्र सरकारला अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि किंमत नियंत्रण करण्याचे अधिकार मिळतात. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना ३  महिने ते ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे.

दरम्यान, या निर्णयाचा परिणाम रासायनिक उद्योगांवर होण्याची शक्यता आहे. प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर मर्यादित केल्याने रासायनिक कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. तसेच घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत सुमारे ६० रुपयांची वाढ झाली असून व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा मर्यादित करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!