Homeमहत्त्वाचे१२वी बोर्ड परीक्षेत कॉपीचा भंडाफोड; १९ जणांवर कारवाई प्रस्तावित, केंद्रांची मान्यता रद्द...

१२वी बोर्ड परीक्षेत कॉपीचा भंडाफोड; १९ जणांवर कारवाई प्रस्तावित, केंद्रांची मान्यता रद्द करण्याचा इशारा.

Times Of Maharashtra Desk:राज्यात १० फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या बारावी बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाला धक्का बसल्याचे चित्र समोर आले आहे. काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना थेट कॉपी पुरवली जात असल्याचे प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले असून या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.या प्रकरणाची गंभीर दखल घेत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी संबंधित परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्याचा इशारा दिला आहे. तसेच पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सीसीटीव्हीत कॉपीचा प्रकार कैद

परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसविणे, पिण्याचे पाणी, बस व्यवस्था आणि इतर सुविधा सुरळीत ठेवण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. तरीही काही ठिकाणी परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. परीक्षा केंद्रावरील अधिकारी आणि पर्यवेक्षकच विद्यार्थ्यांना मदत करत असल्याचे फुटेज समोर आल्यानंतर प्रशासन हादरले आहे.राज्यात शिक्षण विभागाचेवतीने कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविले जात आहे. विद्यार्थ्यांनी निर्भयपणे परीक्षा द्यावी, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र ज्या केंद्रांवर गैरप्रकार घडले, त्या ठिकाणी कडक कारवाई करण्यात येईल. संबंधित केंद्रांची परवानगी रद्द केली जाईल. कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह केंद्रप्रमुख आणि संबंधितांवरही कारवाई होईल असा इशाराही आता संबंधितांना देण्यात आला आहे.

मराठवाड्यात कॉप्यांचा सुळसुळाट

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर कॉपी प्रकरणे समोर आली आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान मोठा गैरप्रकार उघडकीस आला.सीसीटीव्ही फुटेज आणि उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रतींच्या आधारे तब्बल १९ जणांविरुद्ध कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

१९ जणांविरुद्ध निलंबनाची प्रक्रिया

या प्रकरणात परीक्षा केंद्र संचालकासह एकूण १९ जणांविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या पर्यवेक्षक शिक्षक आणि संबंधित पथकातील अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इतर संस्थांशी संबंधित कर्मचाऱ्यांवर संस्थात्मक शिस्तभंगात्मक तसेच कायदेशीर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आणि विभागीय बोर्डाचे अध्यक्ष अनिल साबळे यांच्या आदेशानुसार कारवाईची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शिक्षणाधिकारी  अश्विनी लाठकर यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने तपास पूर्ण केला आहे.

“कॉपीमुक्त अभियाना” ला धक्का

राज्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी शिक्षण विभागासोबत महसूल, गृह आणि ग्रामविकास विभागाचे सहकार्य घेण्यात येत आहे. नियमित आढावा बैठका घेतल्या जात असतानाही अशा घटना समोर आल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.दरम्यान, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा देत सरकारने कॉपीप्रकरणी शून्य सहनशीलतेची भूमिका स्पष्ट केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...
error: Content is protected !!