मुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरांमध्ये आज सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावलीये. या पावसाचा संपूर्ण शहराच्या दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम दिसून येतोय. मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाने झोडपले आहे.
हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासा उद्या ( गुरूवारी ) रेड अलर्ट जाहीर रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
मुंबईच पश्चिम उपनगरांमध्ये अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ आणि वांद्रे या सर्व भागांमध्ये जोरदार सरी कोसळतायत. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा पालघरमध्ये तीव्र रूप धारण केल्याने अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. पालघर जिल्ह्यात उद्या देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
पालघर जिल्ह्याला 2 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी या संबंधित आदेश जारी केले आहेत, अस असलं तरी मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मात्र कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाचे काम करावं लागणार आहे.
पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा
पालघर जिल्ह्यात गुरुवारी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलं. हवामान खात्याच्या रेड अलर्ट इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 2 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. त्यापार्श्वभूमीवर पालघर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय.






















