परळी (प्रतिनिधी) राज्यात आणि देशात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्त्व, महामानव, परमपूज्य, मानवतावादीचे उद्धारकर्ते, कामगारांचे नेते, कायदेपंडित, सिम्बॉल ऑफ नॉलेज,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निर्माते, डॉ बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक, शैक्षणिक, धम्म कार्य, जनजागृती चळवळ आणि भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधून राज्यातील विविध क्षेत्रातील ७५ बौद्ध उपासक – उपासकांना संयुक्त राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कारांने तेजस सेवा प्रतिष्ठाणनच्यावतीने अहिल्यनगर जिल्यातील संगमनेर तालुकात भवदिव्य सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
राज्यात अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण संदर्भात कार्य, बौद्ध धम्माचे कार्य, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आंबेडकरी विचारांची जनजागृती, आंबेडकरांची चळवळ गतिमान, गाठीशील, क्रियाशील करण्यासाठी प्रयत्नशील, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे, माजी राज्य कार्याध्यक्ष, वृत्तपत्रातून फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे लिखाण साप्ताहिक जन सन्मान दैनिक परळी सन्मानचे मुख्य संपादक, रिपब्लिकन सन्मान सभेचे -राष्ट्रीय मुख्य समन्वयक, वृत्तपत्रांमध्ये प्रखरमत, संपादकीय लेख, स्तंभलेखक, पत्रकारितेत संघटन कौशल्य, आंबेडकरवादी दृष्टिकोन, शैक्षणिक क्षेत्रात गेली तीस वर्षांपासून कार्यरत प्रा. डॉ. दशरथ वैजनाथ रोडे यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार पुरस्काराने संगमनेर येथील मालपाणी लॉन्स भव्यदिव्य कार्यक्रमात अँड. संघराज रूपवते, साहित्यिक. प्रा. डॉ. मुकुंद भारसाकळे, अकोलेचे आ.किरण लहामटे. तेजस सेवा प्रतिष्ठाणनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रविद्र घोसाळे यांच्या उपस्थित पुरस्कार देण्यात आला.
देशात भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संविधान अमृत महोत्सव आणि राज्यातील ७५ बौद्ध उपासक आणि उपसीकांना एक ऐतिहासिक सण म्हणून बौद्ध समाजातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, धम्म कार्य, साहित्यिक, चित्रपट, कला, औद्योगिक, आंबेडकरी अनुयायांना उल्लेखनीय कार्य करणाऱ्याना विविध क्षेत्रात राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. तेजस सेवा प्रतिष्ठानच्यावतीने पुरस्कारांचे आयोजन करण्यात आला होता. याप्रसंगी राज्यातील विविध जिल्यातील विविध क्षेत्रातील संविधान अमृत महोत्सव साजरा करून राज्यात एक ऐतिहासिक सणचे तेजस सेवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष डॉ रविद्र घोसाळे यांच्यासह कार्यक्रमात अँड. संघराज रूपवते, साहित्यिक. प्रा. डॉ. मुकुंद भारसाकअकोलेचे आ.किरण लहामटे.
अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला तसेच भारतीय संविधानाचे उद्देशिका सर्वांनी वाचन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आले.






















