Homeताज्या बातम्याविंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी

निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात छोटा हत्ती वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर वाहनातील कांदा मालक गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पिंपळस – येवला राज्य महामार्गावरील सुरू असलेल्या कॉंक्रिटीकरणाच्या कामामुळे निर्माण झालेल्या एकेरी वाहतुकीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाकद येथील एम.एच ४३ बी.बी ०३१० क्रमांकाचा छोटा हत्ती कांदा विक्रीसाठी विंचूर येथील माऊली वजन काटा व पेट्रोल पंपाजवळून जात असताना समोरून येणाऱ्या छत्तीसगड येथील सी.जी २९ ए.जी ५४७३ क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या १६ टायर ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात छोटा हत्तीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, छोटा हत्ती सुमारे दहा फूट फरफटत जाऊन रस्त्याच्या कडेला उलटला. अपघातात या वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या भीषण अपघातात छोटा हत्ती चालक ज्ञानेश्वर दगडू शिंदे, रा.वाकद यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या शेजारी बसलेले कांदा मालक शरद विठ्ठल गायकवाड हे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमीला बाहेर काढून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात रवाना केले.
घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत ज्ञानेश्वर शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बाळासाहेब कांदळकर करीत आहेत.
सध्या पिंपळस – येवला राज्य महामार्गाचे कॉंक्रिटीकरण सुरू असल्याने विंचूर परिसरात अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. अरुंद मार्ग, मोठ्या वाहनांची वाढती वर्दळ आणि ओव्हरटेक करण्याच्या प्रकारांमुळे या परिसरात वारंवार अपघात घडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या मार्गावर तातडीने प्रभावी वाहतूक नियंत्रण, वेगमर्यादेची अंमलबजावणी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते आणि राष्ट्रचेतनेचे जागृत शिल्पकार

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनीधी: " स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच . " या एका घोषणेने लाखो भारतीयांच्या मनामध्ये...

महसूल दिन (एक ऑगस्ट ) – इतिहास , उगम , छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीपासून...

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: १ ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्रात महसूल दिन म्हणून साजरा केला जातो . हा दिवस केवळ महसूल विभागाचा वर्धापनदिन नसून...

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते आणि राष्ट्रचेतनेचे जागृत शिल्पकार

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनीधी: " स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच . " या एका घोषणेने लाखो भारतीयांच्या मनामध्ये...

महसूल दिन (एक ऑगस्ट ) – इतिहास , उगम , छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीपासून...

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: १ ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्रात महसूल दिन म्हणून साजरा केला जातो . हा दिवस केवळ महसूल विभागाचा वर्धापनदिन नसून...
error: Content is protected !!