Homeताज्या बातम्यागावी जाण्यासाठी ११ मे पासून मोफत एसटी सेवा सुरू होणार - परिवहन...

गावी जाण्यासाठी ११ मे पासून मोफत एसटी सेवा सुरू होणार – परिवहन मंत्री अनिल परब

गावी जाण्यासाठी ११ मेपासून मोफत एसटी सेवा सुरू होणार…

 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतही कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असून काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. आता सरकारकडून गावी जाण्यासाठी एसटीसेवा सुरू करण्यात येणार आहे. ११ मे पासून ही सेवा सुरू केली जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे हा प्रवास मोफत असणार आहे. अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

 

 

मुंबई पुणे येथे अडकलेल्या लोकांना गावी जाण्यासाठी सोमवार ११ मेपासून एसटी सेवा सुरू होणार आहे. मुंबई, पुण्यासह विविध शहरात, गावात अडकलेल्या लोकांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे.

 

गावी जाण्यासाठी एसटी बसेसचं बुकिंग सुरू होणार निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. तसेच गावी जाण्याचा हा संपूर्ण प्रवास हा मोफत असणार आहे.

 

 

बुकिंग करण्यासाठी महत्वाचे मुद्दे :-

 


 

▪२२ जणांचे ग्रुप बुकिंग किंवा वैयक्तिक बुकिंगही करता येणार आहे. ग्रुप बुकिंगसाठी २२ जणांची यादी सादर करून प्रवासाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच वैयक्तिक व्यक्ती किंवा कुटुंबाला जाण्यासाठीही परवानगी घ्यावी लागणार आहे.

 

 

▪शहरी भागात ही परवानगी  पोलीसांकडून दिली जाईल तर ग्रामीण भागात ही परवानगी तहसिलदार कार्यालयाकडून दिली जाईल.

 

 

▪२२ जणांच्या ग्रुपला परवानगी मिळाली की सदर परवानगी पत्र विभागीय नियंत्रकाकडे सादर करून बसची मागणी करायची आहे. ही बस तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंत जाईल.

 

 

▪वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रवास करणाऱ्यांनी MSRTC च्या पोर्टलवर जाऊन बुकिंग करायचं आहे. बुकिंग करताना परवानगी पत्र अपलोड करायचं आहे. एसटी बस पहिल्या स्टॉपला सुरू होऊन थेट शेवटचा स्टॉपला थांबेल.

 

 

▪लांब पल्ल्याच्या बसेस प्रसाधनगृहासाठी एसटीच्या डेपोतच थांबणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी खाण्या-पिण्याचं साहित्य सोबत घ्यायचं आहे.

 

 

▪बस सुटण्याआधी सॅनिटाईज केली जाईल, तसेच प्रवाशांना सोडल्यानंतर तिथून निघतानाही ती सॅनिटाईज केली जाईल.

 

 

▪प्रवाशांना मास्क बंधनकार, सॅनिटायझर वापरणे बंधनकार आहे. एका सीटवर एकच प्रवाशी बसण्यास परवानगी, झिक्झॅक पद्धतीने प्रवाशी बसणार…

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...
error: Content is protected !!