Homeताज्या बातम्याजगावर आलंय कोरोनापेक्षाही महाभयानक संकट...

जगावर आलंय कोरोनापेक्षाही महाभयानक संकट…

जगावर आलंय कोरोनापेक्षाही महाभयानक संकट…

 

पुणे : कोरोना सारख्या महामारीच्या संकटानं देशासह संपूर्ण जगाचं कंबरडं मोडलय. यात बळीराजा तर कोलमडलाय. यातच आता त्याच्यासमोर टोळधाडीसारखं महाभयानक संकट उभं ठाकलंय. टोळधाडीचं हे संकट साधसुधं नसून त्याचं नुसतं नाव जरी एेकलं तर शेतकऱ्याच्या उरात घडकी भरते. आता हे संकट महाराष्ट्रातील विदर्भात पोहोचलंय. टोळधाड आली म्हणजे शेतच्या शेतं नष्ट होतात आणि त्यात शेतकरी पुरता भरडला जातो. टोळधाडीचा थवा उभ्या पिकाचा डोळ्यादेखत फडशा पाडताना बळीराजाला नुसतं त्यांच्याकड पाहण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. परंतु नुसत्या नावानं धडकी भरविणाऱ्या या टोळधाडीबद्दल अनेकांना खूप कमी माहिती आहे.

 

उभ्या पिकाला उधवस्त करणारी टोळ धाड म्हणजे नक्की काय असा प्रश्न अनेकांना पडत असतो.

 

संपूर्ण जगाला धोका

 

एफएओचे वरिष्ठ टोळधाड अंदाज अधिकारी केथ क्रेसमॅन यांच्या मते, वाळवंटीय टोळ ही चिंताजनक कीड असून याचा धोका संपूर्ण जगाला आहे. त्यामुळे जगाची अन्नसुरक्षा धोक्यात येऊ शकते.

 

खरचं असं झालं तर कोरानापेक्षा महाभयान संकटाला जगाला सामोरं जावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्व आफ्रिकेतील टोळधाडीचं उग्र रुप पाहून ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी विनाशकारी समस्या असल्याचं मत संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवता विभागाचे प्रमुख मार्क लोकाक यांनी व्यक्त केलं होतं. पूर्व आफ्रिकेतून वाळवंटीय टोळचा शिरकाव भारत आणि पाकिस्तानात जूनमध्ये होईल, असा इशारा नुकताच एफएओने दिला होता. हा इशारा आता खरां ठरलाय.

 

महाराष्ट्रात तर रब्बी हंगामात टोळधाडीच्या प्रादुर्भावाची शक्यता काही जाणकारांनी वर्तवली होती. मुबलक पाऊस पडून सर्वत्र हिरवळ पसरते, त्यावेळी टोळधाडीचा उद्रेक होत असतो, हा जगभरातील अनुभव आहे. त्यामुळंच देशात जून-जुलैमध्ये चांगल्या पाऊसमानानंतर ही टोळधाड धुडगूस घालते. परंतु, राज्यात वेळेआधीच मे मध्ये टोळधाडीचं महासंकट दाखल झालय. पाकिस्तानातून राजस्थान – गुजरात – मध्यप्रदेश मार्गे ही टोळधाड आपल्या राज्यातील अमरावती, वर्धा जिल्ह्यासह नागपुरातील काटोल आणि कळमेश्‍वर तालुक्‍यात देखील येऊन धडकलीय. त्यामुळं कोरोना लॉकडाउनने आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता टोळधाडीला नियंत्रणात ठेवण्याचं एक नवं आणि अत्यंत कठीण आव्हान उभं राहिलंय.

 

५८ वर्षांनंतर भारतावर महासंकट

 

भारतात गेल्या शंभर वर्षात प्रत्तेक वेळी पाच ते सात वर्षे टिकणाऱ्या दहाटोळ धाडींची नोंद आहे. त्यातील अगदी अलीकडची धाड १९५९ ते १९६२ या काळातील होती. १९६२ नंतर आता म्हणजे २०२० मध्ये ती पुन्हा नागपुरला आल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सेंटर फॉर सेरिक्‍चलर ऍण्ड बायोलॉजिकल पेस्ट मॅनेजमेंट रिसर्चचे (सीबीएसआर) संचालक डॉ. मनोज रॉय यांनी दिली.

संपुर्ण महाराष्ट्रात पत्रकार नेमणे आहे :-

संपर्क – मुख्य संपादक मुज्जम्मील शेख – ७५०७७३७३१३

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंडमध्ये बोरावके नगर ते देव पाम रस्ता महिनोन्‌महिने अर्धवट, नागरिकांची तीव्र नाराजी

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड राहुल आढाव) दौंड शहरातील बोरावके नगर ते देव पामपर्यंतचा रस्ता विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र शासन व दौंड नगरपरिषद अंतर्गत मंजूर...

बोगस लॅबोरेटरींना शासनाचे संरक्षण? जनतेचे आरोग्य धोक्यात; सुरक्षित आरोग्य जनतेची मागणी

0
Times Of Maharashtra Desk:राज्यात सुमारे ८००० हून अधिक पॅथॉलॉजी लॅबोरेटरी पॅथॉलॉजिस्टशिवाय सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे अध्यक्ष डॉ....

गांधी चौकात रात्री १२.३० ला काँक्रीट मिक्सरचा गडगडाट – नगरपालिकेची मंजुरी आहे का?

0
मध्यरात्रीची घाई कशासाठी? दौंडमध्ये रस्त्याचे काम संशयाच्या भोवऱ्यात संघराज गायकवाड, राहुल आढाव (दौंड प्रतिनिधी) : शहरातील गांधी चौक परिसरात जोगळेकर हॉटेलच्या मागील भागात काल रात्री...

निसर्ग मित्र समितीकडून ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियानासाठी निवेदन

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणी जळगाव, प्रतिनिधी (विनोद पवार) : होळी सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यात यावा, यासाठी ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियान राज्यभर राबविण्याची...

कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्याची मागणी

0
ग्रामस्थ व ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट’चे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन कुंड खुर्द (ता. मलकापूर), प्रतिनिधि : ग्राम कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्यात यावे, अशी...

दौंडमध्ये बोरावके नगर ते देव पाम रस्ता महिनोन्‌महिने अर्धवट, नागरिकांची तीव्र नाराजी

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड राहुल आढाव) दौंड शहरातील बोरावके नगर ते देव पामपर्यंतचा रस्ता विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र शासन व दौंड नगरपरिषद अंतर्गत मंजूर...

बोगस लॅबोरेटरींना शासनाचे संरक्षण? जनतेचे आरोग्य धोक्यात; सुरक्षित आरोग्य जनतेची मागणी

0
Times Of Maharashtra Desk:राज्यात सुमारे ८००० हून अधिक पॅथॉलॉजी लॅबोरेटरी पॅथॉलॉजिस्टशिवाय सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे अध्यक्ष डॉ....

गांधी चौकात रात्री १२.३० ला काँक्रीट मिक्सरचा गडगडाट – नगरपालिकेची मंजुरी आहे का?

0
मध्यरात्रीची घाई कशासाठी? दौंडमध्ये रस्त्याचे काम संशयाच्या भोवऱ्यात संघराज गायकवाड, राहुल आढाव (दौंड प्रतिनिधी) : शहरातील गांधी चौक परिसरात जोगळेकर हॉटेलच्या मागील भागात काल रात्री...

निसर्ग मित्र समितीकडून ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियानासाठी निवेदन

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणी जळगाव, प्रतिनिधी (विनोद पवार) : होळी सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यात यावा, यासाठी ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियान राज्यभर राबविण्याची...

कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्याची मागणी

0
ग्रामस्थ व ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट’चे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन कुंड खुर्द (ता. मलकापूर), प्रतिनिधि : ग्राम कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्यात यावे, अशी...
error: Content is protected !!