Homeसामाजिकमुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे कविसंमेलन रंगले ऑनलाईन मिळाली रसिकांची दाद...

मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे कविसंमेलन रंगले ऑनलाईन मिळाली रसिकांची दाद…

मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे कविसंमेलन रंगले ऑनलाईन मिळाली रसिकांची दाद…
पुणे : ग्रामीण मुस्‍लिम मराठी साहित्य चळवळ व महाराष्ट्र राज्य आयोजित रविवारी (ता.२१) झालेल्या एकदिवसीय दुसऱ्या ऑनलाइन साहित्य संमेलनात व्याख्यान व कवी संमेलन अशा दोन सत्रात संमेलन घेण्यात आले. त्‍याला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्‍थानी कवी ॲड. हाशम पटेल (लातूर), तर उद्‍घाटक म्‍हणून प्रख्यात समिक्षक प्रा. डॉ. अक्रम पठाण (नागपूर) तर प्रमुख पाहुणे म्‍हणून कवी के. टी. काझी (औसा), ॲड. जमील देशपांडे (जळगाव), हबीब भंडारे (औरंगाबाद) यांची उपस्‍थिती होती. पहिल्या सत्रात प्रा. डॉ. अक्रम पठाण यांनी ‘मुस्‍लिम मराठी साहित्य पार्श्चभुमी’ या विषयावर विचार मांडले. मराठी मुसलमान या फेसबुक पेजवरून ते लाईव्ह दाखविण्यात आले.
        निमंत्रित कवींचे कवीसंमेलन दुसऱ्या सत्रात कवी ॲड. हाशम इस्‍माईल पटेल यांच्या अध्यतेखाली निमंत्रित कवींचे कवीसंमेलन उत्‍साहात पार पडले. त्‍यांनी त्‍यांची  शालेय अभ्यासक्रमाला असलेली “शांतीगीत ”  या शीर्षकाची कविता सादर केली. कवी के. टी. काझी यांनी ‘काजळ’ या कवितेतून ठारच मारायचंय मला तर तलवार नको, पाजळ साहिल कोणा दुसऱ्यासाठी सजव, तु नयनात काजळ अशी परोपकार दाखविणारी कविता सादर केली. ॲड. जमील देशपांडे यांनी फादर डे निमित्त सादर केलेल्या कवितेला दाद मिळाली. त्‍यांनी बापाच्या खांद्यावर, अश्रू खुप गेली, बापाचा जनाजा होता खांद्यावर ही कविता सादर केली. कवी चॉंद तरोडकर यांनी खड्डा मनात मोठा, खोदून पाहतो, दुःखास त्‍यात आता लोटून पाहतो, स्‍वप्नात चॉंद माझ्या येईल काय ती, चल मग उगल आता झोपून पाहतो, ही कविता सादर केली. कवियत्री अनिसा शेख (पुणे) यांनी स्‍त्रीवादी कविता सादर केली. मी आजची नारी अबला नाही, कमजोर तर नाहीच नाही, आवाज उडवते अन्याया विरुध्द, वावड्या नजरांना सोडणार नाही. कवी वाय. के. शेख यांनी तुझ्याच लकबी, तुझ्यास सवयी, काळजात माझ्या बसली कवीता. कवयित्री शब्‍बाना मुल्‍ला यांनी शेतकरी कविता सादर केले. माझ्या सोन्याचा संसार, जरी पोट शेतावर, घाम गळाते अंगाचा, रोज काळ या मातीवर , कवी अहमद पिरनसाहब यांनी बोलतो मराठी, लिहतो मराठी, ऐकतो मराठी, आवडीने हा संदेश दिला.
कवी हबीब भंडारे यांनी सुन्या माळावर दर्गा, नेटात ऊरुसामधी गजबजलेली दुआ मागताना नवसाची, वचन ओठात कुजबुजलेली ही तुरबतीला आले गहिरेपण ही कविता सादर केली. कवी दाम्‍पत्य जाकीर तांबोळी व सफुरा तांबोळी यांनीही यात सहभाग घेत कवियत्री सफुरा तांबोळी यांनी कोरोनाच्या काळात ओढ लागली. मला माहेरची, माझ्या आईच्या प्रेमळ कुरवाळायची, ओढ लागली मला माहेरची माझ्या बापाच्या वत्‍सक नजरेची तसेच कवी दिलशाद सय्यद अहमदनगरकर यांनी संत गाडगेबाबा यांच्यावरील अंभग सादर केला. गरीबाचे वाली, अनाथाचे साथी, खापरच माथी, सदोदित स्‍वच्‍छतेचा नारा, घरोघरी दिला, धावे सफाईला, अंगणातही सफाईच ही कविता सादर केली. या संमेलनात कवी जाकीर तांबोळी, कवयित्री जस्‍मीन शेख, कवी बा. हा. मगदुम , ॲड. शेख इक्‍बाल रसुलसाब, अख्तर शेख, बी. एल. खान यांनीही कविता सादर केल्या. कवी खाजाभाई बागवान यांनी सूत्रसंचालन केले तर कवी शफी बोल्‍डेकर यांनी आभार मानले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुरोगामी महाराष्ट्र फक्त भाषणातच? कृतीत मात्र वाढता जातीयवाद आणि स्वार्थी राजकारण

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज — न्याय, समानता आणि सर्वसमभावाच्या विचारांना राजकीय स्वार्थाचा फटका. महाराष्ट्राची ओळख ही केवळ भौगोलिक सीमांमुळे नाही, तर सामाजिक...

गेवराईत विशेष मतदार यादी पुनरीक्षणासाठी BLO, पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण संपन्न

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): निवडणूक भारत आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, सर्वसमावेशक व त्रुटीमुक्त करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत गेवराई...

पाणीटंचाईवर मात; रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्यांना कर सवलत!

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख): आजचे बदलणारे हवामान, अनियमित पर्जन्यमान आणि वाढती पाण्याची मागणी यामुळे भूजल पातळी सातत्याने घटत चालली आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर, भविष्यातील...

जीवघेण्या पॉलीट्रॉमावर मात: अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथे 50 हून अधिक डॉक्टर आणि आरोग्यसेवकांनी...

0
नवी मुंबई, 25 जून 2026: 37 वर्षीय मर्चंट नेव्हीतील रँकिंग ऑफिसर मृत्यूच्या दारातून परत आला असून आज तो पुन्हा स्वतःच्या पायावर उभा आहे. अपोलो...

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी – खांडे पारगाव...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी...

पुरोगामी महाराष्ट्र फक्त भाषणातच? कृतीत मात्र वाढता जातीयवाद आणि स्वार्थी राजकारण

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज — न्याय, समानता आणि सर्वसमभावाच्या विचारांना राजकीय स्वार्थाचा फटका. महाराष्ट्राची ओळख ही केवळ भौगोलिक सीमांमुळे नाही, तर सामाजिक...

गेवराईत विशेष मतदार यादी पुनरीक्षणासाठी BLO, पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण संपन्न

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): निवडणूक भारत आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, सर्वसमावेशक व त्रुटीमुक्त करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत गेवराई...

पाणीटंचाईवर मात; रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्यांना कर सवलत!

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख): आजचे बदलणारे हवामान, अनियमित पर्जन्यमान आणि वाढती पाण्याची मागणी यामुळे भूजल पातळी सातत्याने घटत चालली आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर, भविष्यातील...

जीवघेण्या पॉलीट्रॉमावर मात: अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथे 50 हून अधिक डॉक्टर आणि आरोग्यसेवकांनी...

0
नवी मुंबई, 25 जून 2026: 37 वर्षीय मर्चंट नेव्हीतील रँकिंग ऑफिसर मृत्यूच्या दारातून परत आला असून आज तो पुन्हा स्वतःच्या पायावर उभा आहे. अपोलो...

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी – खांडे पारगाव...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी...
error: Content is protected !!