Times of Maharashtra Desk, BMC Election : महाराष्ट्रात राजकीय परिस्थिति तापलेली दिसत आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकाकी पडल्याचे दिसून येत आहे.महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुका महाविकास आघाडी कडून लढवायचे ठरवले आहे. काही दिवसांपूर्वी कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने बीएमसी निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत युती करू नये यासाठी काँग्रेस प्रयत्नशील होती. पण कॉँग्रेसचा हा प्रयत्न चांगलाच फसलेला दिसत आहे. जेव्हा मतचोरीचा सामना करण्यासाठी “सत्य मोर्चा” एकत्रितपणे सुरू केला जात आहे, तेव्हा निवडणुका स्वतंत्रपणे का लढायच्या? असे म्हणत शरद पवारांनी आघाडीत राहण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
जर आपण मतांची विभागणी थांबवून एकत्र लढणार नसू, तर आघाडीच कशासाठी? – शरद पवार
मुंबई महानगरपालिका निवडणुका मनसेसोबत लढाव्यात की नाही, असा प्रश्न असताना काँग्रेसने स्पष्टपणे सांगितले की त्या स्वबळावरच लढणार. त्यामुळे महाविकास आघाडीचे गणित बिघडले, कारण मनसेच्या मदतीने आघाडी मुंबईत सत्ता मिळवू शकते अशी चर्चा होती.काँग्रेसच्या या भूमिकेमुळे परिस्थिती बदलली. त्यामुळे शरद पवार यांनी इतर आघाडीच्या नेत्यांना इशारा दिला की जर आपण मतांची विभागणी थांबवून एकत्र लढणार नसू, तर आघाडीच कशासाठी? आघाडीत सर्वात मोठे आणि जेष्ठ नेते म्हणून शरद पवार यांना मान आहे. त्यामुळे आता शरद पवारांनी दिलेला इशारा आघाडी पक्ष मान्य करणार का या वर सर्वांचे लक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील संभाव्य युतीबाबत शरद पवार सकारात्मक आहेत. महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीबाबत किंवा त्यांच्या एकतेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. आता मुंबईमध्ये महावीकस आघाडी एकत्र लढणार की वेगवेगळे यावर सर्वांचे लक्ष आहे.



















