Homeताज्या बातम्यामार्कर शाईवरून महानगरपालिका निवडणुकांत खळबळ; बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या तक्रारींनी बोगस...

मार्कर शाईवरून महानगरपालिका निवडणुकांत खळबळ; बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या तक्रारींनी बोगस मतदानाचा संशय

Times Of Maharashtra : राज्यभरात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांदरम्यान मतदानानंतर बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. यंदा पारंपरिक न मिटणाऱ्या शाईऐवजी मार्कर पेनचा वापर करण्यात आल्याने ही शाई सहज पुसली जात असल्याच्या तक्रारी विविध ठिकाणांहून समोर येत आहेत. त्यामुळे बोगस मतदानाचा धोका वाढल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

पुण्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३४ (नऱ्हे, वडगाव बुद्रुक, धायरी) येथे काही महिला आणि अल्पवयीन मुलांकडून बोटावरील शाई लिक्विड किंवा फिनरने पुसून पुन्हा मतदान केल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे. धायरी फाट्याजवळील नारायणराव सणस विद्यालयातील मतदान केंद्राबाहेर अशाच संशयित प्रकारात एका व्यक्तीला पकडण्यात आल्याची घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मुंबईतही असाच प्रकार समोर आला असून मतदान करून परतलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील मार्करची शाई पुसली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी नखावरील शाई पुसली जात असल्याची कबुली दिली आहे. तसेच या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कोल्हापूरमधील कर्मवीर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मतदान केंद्रावरही अशाच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की २०१२ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मार्करचा वापर केला जात आहे. मात्र, मतदानाच्या ऐनवेळी घेतलेल्या निर्णयांमुळे आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. उल्हासनगरमध्येही मतदानानंतर बोटावरील शाई लगेच पुसली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या सर्व घटनांमुळे निवडणूक प्रक्रियेतील सुरक्षितता आणि विश्वासार्हतेबाबत गंभीर चर्चा सुरू झाली असून आयोगाकडून कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते आणि राष्ट्रचेतनेचे जागृत शिल्पकार

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनीधी: " स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच . " या एका घोषणेने लाखो भारतीयांच्या मनामध्ये...

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते आणि राष्ट्रचेतनेचे जागृत शिल्पकार

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनीधी: " स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच . " या एका घोषणेने लाखो भारतीयांच्या मनामध्ये...
error: Content is protected !!