Homeपर्यावरणअवकाळी पावसाचा शिरपूर तालुक्याला मोठा फटका

अवकाळी पावसाचा शिरपूर तालुक्याला मोठा फटका

शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका तब्बल 30 गावांना बसला असून एकूण 480 शेतकरी बाधित झाले आहेत. प्राथमिक अहवालानुसार सुमारे 392 हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे.

या अवकाळी पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः बाजरी, मका, रब्बी ज्वारी आणि गहू ही पिके आडवी पडून उत्पादनावर परिणाम झाला आहे. तसेच केळी व पपईसारख्या फळपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे चित्र दिसून आले.

     

शेतकऱ्यांनी आधीच उत्पादन खर्च करून पिकांची निगा राखली असताना अचानक आलेल्या या आपत्तीमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी असल्याने या नुकसानीमुळे त्यांची चिंता आणखी वाढली आहे.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने हालचाल करत संबंधित गावांतील तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांना नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्यक्ष पाहणी करून अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असून त्यानंतर शासनाकडून मदत व नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कार्यवाही केली जाणार आहे.

तहसीलदार महेंद्र माळी यांनी सांगितले की, “सदर माहिती प्राथमिक स्वरूपाची असून सर्व बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासन स्तरावर प्रस्ताव सादर केला जाईल.”

शेतकरी वर्गाने तात्काळ आपल्या शेतातील नुकसानीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून मदत प्रक्रियेत कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...
error: Content is protected !!